<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045</id><updated>2012-02-16T05:25:28.058-08:00</updated><category term='कविता'/><category term='मुक्तक'/><category term='अनुभव'/><category term='कथा'/><category term='पुस्तक'/><title type='text'>अळवावरचे पाणी</title><subtitle type='html'>भूत भविष्य भासच नुसते विश्व नवे क्षणोक्षणी&lt;br&gt;जमती उठती मैफिली इथे विरती वाऱ्यावरती गाणी&lt;br&gt;आरंभातच बीज अंताचे गूढ अटळ ही दैववाणी&lt;br&gt;दुःख क्षणाचे हर्ष क्षणाचा मी तर अळवावरचे पाणी</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>18</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-6191391179476014200</id><published>2012-02-06T01:10:00.001-08:00</published><updated>2012-02-06T01:10:48.224-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>जन्मठेप</title><content type='html'>फिनाईलच्या त्या अभद्र वासातून बाहेर पडून तो त्या हॉस्पिटलच्या सदैव आ  वासलेल्या पोर्चमध्ये आला तेव्हा शहराच्या चिरपरिचित दुर्गंधीने त्याला  पुन्हा वेटोळे घातले. आतून काचेच्या खिडकीतून दिसणारी झळाळती कलती दुपार  बाहेर आल्यावर त्याला नासलेल्या आंब्यासारखी वाटू लागली. एका झुळझुळणार्‍या  संध्याकाळी गाव सोडून साचलेल्या गाळासारख्या दमट सकाळी त्याने या शहरात  पाय ठेवला तेव्हाही त्याला त्या दुर्गंधीने असेच मख्खपणे वेटोळे घातले  होते. ते लाजिरवाणे दिवस आठवले की त्याला अगदी कसेनुसे होई आणि मानेला झटका  देऊन तो तोंडाने काहीतरी असम्बद्ध बोले. &lt;br /&gt;कधीकाळी रूपवान असलेल्या जख्ख वेश्येसारखे त्याचे गाव होते. तालुक्याचे  गाव. पूर्वी कोणातरी सम्राटाने वसवलेले व्यापाराचे केंद्र. पावसाळ्यात  डोक्यावर ढग बांधणार्‍या हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले. पाचूच्या  दागिन्यातून दिसणार्‍या फोडासारखे गाव. काप जाऊन उरलेल्या भोकांमध्ये  राहणार्‍या दलालांचे गाव. त्या गावातल्या रस्त्यांवर सुखवस्तुंच्या  घरातल्या सांडपाण्याच्या नद्या वाहत असत आणि त्यातून श्रीमंतांच्या गाड्या  गेल्या की गाळाचे शिंतोडे पायी चालणार्‍या गरीबांवर उडत. अशा रस्त्यावर  वाहणार्‍या अनेक ओघळांपैकी कोणत्यातरी एका ओघळाच्या उगमापाशी त्याची आई  धुणं-भांडी करत बसलेली असायची आणि एखादा ओघळ मोठ्या गटारीला जिथे मिळतो  तिथे त्याचा बाप दारू पिऊन पडलेला आढळायचा.&lt;br /&gt;या सगळ्यांपासून दूर डोंगरउतारावर बोरे,चिंचा,पेरू,करवंदे खात आणि सशांच्या  मागे हुंदडत सळसळणारे त्याचे बालपण एकदिवस त्याच्या आईने महात्मा  विद्यालयाच्या दावणीला बांधले. डोक्याला रोज तेल लावून येणारी गोरीगोबरी  मुले, सकाळीसकाळी केलेल्या पुजेत लावलेल्या अगरबत्तीचा गंध वागवणारे  मास्तर, मागच्या बाकड्यांवर जमा झालेली त्याच्यासारखीच काही चुकार मेंढरे  आणि इतिहास-भूगोलाची सरकारी छापील पुस्तके यांच्या संगतीत त्याचे दिवस  रसहीन होऊ लागले. ज्यांच्या घरी त्याची आई काम करायची अशा मुलांच्या नजरा  चुकवत, आया-मावश्यांनी लिहून दिलेल्या त्यांच्या निबंधांचे मास्तरांनी  केलेले कौतुक ऐकत आणि कोपर्‍यातल्या जागेत बसून दूर दिसणारे डोंगर बघत  त्याने शाळेची आणि कॉलेजची शिक्षा संपवली. डोंगरउतारावरच्या सुखाचा त्याग  करून कॉलेज कँटीनमधल्या टवाळक्यांचा आनंद मिळवला. कबर्‍या रंगाचे गोबरे ससे  सोडून डिग्रीचा कांचनमृग मिळवला. त्याची अडाणी आई धन्य-धन्य झाली. भिजल्या  डोळ्यांनी कामाच्या ठिकाणी मूठमूठ पेढे वाटून आली. त्याला कुठंतरी  चिकटवण्यासाठी साहेब लोकांना गळ घालून आली. तोही पेपरातल्या जाहिराती वाचून  कामधंदा शोधायला भटकू लागला. सरकारी नोकरीच्या लोभस ढेपेला परंपरागत  चिकटलेल्या आणि आरक्षणातून चिकटलेल्या मुंगळ्यांपैकी एक होण्याचाही त्याने  प्रयत्न केला. सरकारी खात्यांच्या आणि बँकांच्या कसल्या कसल्या परीक्षा देऊ  लागला. शिक्षा संपली तरी त्याची परीक्षा संपली नाही. वस्तीतल्या चौकात  टवाळक्या करणार्‍या घोळक्यातल्या निरर्थकपणे उगवणार्‍या दिवसांच्या  सिगारेटी वळून कोडगेपणाचा धूर सोडणार्‍या लोकांचा त्याला हळूहळू हेवा वाटू  लागला. त्याचा बाप अधिकृतपणे मेला आणि आई आपला उद्धार होत नाही हे पाहून  खचली. त्याला शिव्या-शाप देऊ लागली. शेवटी जसे सांडपाण्याचे सगळे ओघळ  मोठ्या गटारीला जाऊन मिळावे तसे सगळ्या लाचार अस्तित्वांचे लोंढे जाऊन  मिळणार्‍या या शहरात तो आला.&lt;br /&gt;ते आठवून तोंडात जमा झालेला कडवटपणा त्याने थुंकून टाकला आणि सिगारेट  काढायला खिसे चाचपू लागला. पँटच्या उजव्या रिकाम्या खिशावर हात ठेवताच  त्याच्या पोटात एकदम धस्स झालं, पण पुढच्याच क्षणाला त्या खिशातली जपून  आणलेल्या नोटांची गड्डी आत हॉस्पिटलच्या कॅशियरकडे देऊन आलो आहोत हे त्याला  आठवले. त्याचा धसका नाहीसा झाला पण कपाळावरच्या आठ्यांमध्ये आणखी एकीची भर  पडली. चार दिवसांपुर्वीच झालेला पगार जवळजवळ संपला होता आणि अजून आख्खा  महिना आ वासून पुढे उभा होता. जिकडून मिळेल तिकडून उधार-उसनवारी करून,  कर्जे काढून झाले होते आणि पुढची वीस वर्षे ही कर्जे फेडण्यात जाणार हे  त्याला कळून चुकले होते. आणखी पैसे मिळण्याचे मार्ग संपले होते आणि  पैशाअभावी आता हे उपचारांचे नाटक थांबवावेच लागणार होते.&lt;br /&gt;चुपचाप त्याने खिशातून सिगारेट काढून पेटवली आणि एक झुरका घेऊन खाली मान घालून जमिनीकडे धूर सोडू लागला.&lt;br /&gt;शहरात आला तेव्हा पांडुरंग राशिनकराच्या खोलीवर उतरला होता. उतरला त्याच  दिवशी पांडुने त्याला तो काम करत असलेल्या छोट्याशा कारखान्यात नेले.  जाताना स्टेशनवर रूळ ओलांडताना अचानक वाजलेल्या लोकलच्या भोंग्याने तो  कितीतरी दचकला आणि पांडू आपले गुटखा खाऊन लाल झालेले दात दाखवत खदखदून हसला  होता.&lt;br /&gt;"हे तुझं दुसरं घर", लोकलकडे बोट दाखवून पांडू म्हणाला,"दिवसातले चार-पाच तास तुला यातच काढायचेत."&lt;br /&gt;तेव्हा समोरून लोकलकडे पाहताना मोठ्ठं ठसठशीत गोल कुंकु लावणार्‍या  त्याच्या आईसारखीच वाटली होती ती त्याला. जिना चढून, तिकीट काढून  प्लॅटफॉर्मवर उतरला तेव्हा कुठे त्याला त्या चेहर्‍याच्यामागे लपवलेले  लांबचलांब पिंजरे दिसले. तरीही त्याला ती आईसारखीच वाटली, काहीतरी करायला  भाग पाडणारी.&lt;br /&gt;त्या दिवशी पांडुच्या मार्गदर्शनाखाली धक्काबुक्की करत तो गर्दीत शिरला आणि  मग आत जाऊन दोघे एकमेकाला जवळजवळ चिकटून उभे राहिले. त्या गर्दीतच पांडुने  त्याला त्या शहराबद्दल, तिथल्या श्रीमंतीबद्दल, समुद्रकिनार्‍यांबद्दल,  तिथे चालणार्‍या धंद्यांबद्दल, शहरावरची सत्ता वाटून घेणार्‍या  राजकारण्यांबद्दल, गुन्हेगारांबद्दल आणि कचकड्याच्या दुनियेतल्या  सिनेकलाकारांबद्दल सुरस कथा सांगितल्या तेव्हा तो थरारून गेला होता. अगणित  शक्यता असलेल्या या शहरात कदाचित काहीतरी चमत्कार घडेल असे त्याला वाटले.  काहीतरी घडून आपले आयुष्य बदलेल असे त्याला वाटले. काहीतरी म्हणजे काय हे  मात्र त्याला ठरवता आले नव्हते.&lt;br /&gt;पांडुच्या मुकादमाने त्याला लगेच कामावर ठेवायची तयारी दाखवली आणि ज्यावर  चर्चा करणे शक्य नाही अशा आवाजात पगाराचा आकडा आणि सुट्टीचे दिवस वगैरे  ऐकवले. पांडुच्याच हाताखाली त्याला सोपवून मुकादम निघून गेला आणि पांडुने  त्याची एका यंत्राशी गाठ घालून दिली. त्यादिवसानंतर आठवड्यातले सहा दिवस आठ  तास त्या यंत्राशी कसे वागायचे ते पांडुने त्याला समजावून सांगितले आणि  त्याची नोकरी सुरु झाली.&lt;br /&gt;काही दिवस मजेत गेले. तो आणि पांडू बरोबरच कामावर जायचे आणि काम संपल्यावर  एकत्रच फिरायचे. पांडू त्याला श्रीमंत वस्त्यांमधून घेऊन जायचा आणि काहीतरी  सुरस ऐकीव गोष्टी सांगत तिथल्या टोलेजंग इमारतींकडे, बंगल्यांकडे,  रस्त्यावरून जाणार्‍या गाड्यांकडे आणि गाड्यांमधल्या बायांकडे आशाळभूतपणे  पाहायचा. किंवा समुद्रकिनारी जाऊन ते वेळ काढायचे आणि पांडू तिथे आलेल्या  जोडप्यांचे प्रणयचाळे पाहून चेकाळायचा, अचकटविचकट बोलून हसायचा, करमणूक  करून घ्यायचा. किंवा दोघे चित्रपट पाहायला जायचे आणि संपल्यावर पांडू त्या  नटीबद्दल, चित्रपटातल्या प्रसंगांबद्दल भरभरून काहीतरी बोलत राहायचा. किंवा  मग त्याला खोलीवर पाठवून स्वत: हिडीस रंगरंगोटीखाली त्याहूनही हिडीस असे  दु:ख लपवणार्‍या कुठल्याशा गल्लीत अदृष्य व्हायचा. त्याला हे सगळं नवं होतं  आणि तो उत्सुकतेने सगळं पाहात होता. पगारातला काही भाग तो घरी पाठवत  असल्याने आईही खूश असायची.&lt;br /&gt;पण हळूहळू सगळं त्याच्या मनात साचत जाऊ लागलं. रोज सकाळी तीच वस्ती, तीच  दमट साचलेली हवा. स्टेशनवरची तीच गर्दी आणि पिंजरा घेऊन येणारी आणि कधीकधी  भोंगा वाजवून खिजवणारी तीच लोकल. पांडुची तीच वाह्यात बडबड आणि तेच फालतू  विनोद. त्या शहराचा वखवखलेपणा आणि तुस्तपणा पाहून तो उबगून गेला.&lt;br /&gt;काही दिवसांनी पांडूचं लग्न झालं आणि त्याने वेगळी खोली घेतली. त्यांचं  बरोबर जाणं बंद झालं आणि तो एकटा जाऊ लागला. पांडुची उबग आणणारी बडबड बंद  झाली या आनंदात काही दिवस गेले. तो आता गर्दीत धक्के खात खात पुस्तके वाचू  लागला. लोकांच्या सुखदु:खाच्या गोष्टी, कोणा महान नेत्याचे चरित्र आणि कोणा  नाटककाराची कुरुपता उघडी पाडणारी नाटकं असं रस्त्याच्या कडेला मिळेल ते  वाचू लागला. दोन स्टेशनांच्या मध्ये आकाश दिसेल असे आणि ताजी हवा वाहेल असे  मोकळे मैदान असावे आणि त्यातून फारशी न खडखडता लोकल जावी तसे आयुष्य चालले  होते. पण आईच्या त्या पत्रातून आलेले ते घातक वळण त्याला दिसले नाही. भूक  लागलेल्या माणसाने जंगलातले लालजर्द फळ आधाशासारखे खावे तसे सगळे झाले.  जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे तो मार्गाला लागला. गृहस्थ झाला. आईच्या  इच्छापूर्तीची आणि स्वतःच्या वासनापूर्तीची धुंदी हळूहळू उतरली तोपर्यंत  आईने डोळे मिटले. तिचे शेवटचे सगळे सोपस्कार आटपून तो आला तेव्हा त्याचे  सगळे मागचे धागे तुटलेले होते. तो आता फक्त या शहराचा आणि त्याच्या बायकोचा  होता.&lt;br /&gt;त्याने दुसरी सिगारेट काढून पेटवली आणि अस्वस्थपणे भकाभक दोन झुरके मारले.&lt;br /&gt;त्याची बायको आई होणार हे ऐकल्यावर त्याला त्याच्या मनात आहेत हेच माहित  नसलेले कोणतेतरी सुखतंतू मोहरले होते. पण काही काळच. त्यानंतर लोकलच्या  गर्दीत तो अवघडून उभा असताना एक दिवस अंधारात इंगळी डसावी तसा त्याला त्या  वाक्याचा अर्थ कळला. त्याची बायको आई होणार होती म्हणजे त्याचे मूल तो  होणार होते. त्यादिवशी त्याने डोळे उघडून दाही दिशांना पाहिले. लोकलच्या  त्या घामट गर्दीत विझलेल्या डोळ्यांनी आणि बधीर झालेल्या मनांनी उभी असलेली  सगळी माणसं त्यानं नीट पाहिली. खुरटलेल्या दाढीचा आणि खप्पड चेहर्‍याचा  कोणी, काळाकभिन्न आणि सुरकुत्या पडलेला कोणी किंवा खिडकीशी जागा मिळाली  यातच खूप खूश असलेला कोणी अशी ही सगळी माणसं कधीतरी मुठी चोखत हसणारी  तान्ही बाळं असतील असे त्याला वाटले. त्या जीवांना आपल्या जाळीदार पोटात  घेऊन पळणारी ती लोकल त्याला त्याक्षणी पक्ष्यांची पिले खाणार्‍या  नागिणीसारखी वाटली होती. त्याचे लहान मूल या जगात येईल तेव्हा हीच नागिण  त्यालाही पोटात घेणार होती. हे असे काही होऊ देणार नाही हा निश्चय त्याने  तेव्हाच केला होता. रक्ताचं पाणी करून कष्ट करू पण आपल्या मुलाला चांगले  आयुष्य देऊ असे त्याने तेव्हाच ठरवले. नोकरी करून साईड बिझिनेस करू, दोघेही  अविश्रांत काम करू आणि या जगाच्या उतरंडीच्या वरच्या पायर्‍यांवर मुलाला  घेऊन जाऊ हे त्याने ठरवून टाकले. आपल्या मुलासाठी या विक्राळ  समाजव्यवस्थेने ठोठावलेली सश्रम जन्मठेप जगायला त्याने आपल्या मनाची तयारी  केली.&lt;br /&gt;त्याची दुसरीही सिगारेट संपली आणि त्याने ती खाली टाकून आपल्या हजारोवेळा  शिवलेल्या चपलेखाली पार चप्पट होईपर्यंत चिरडली. हॉस्पिटलच्या दाराकडे  त्याने वळून पाहिले. एमआरआय रूमबाहेर पोराला घेऊन बाकड्यावर वाट पाहत  बसलेली बायको त्याच्या डोळ्यासमोर आली. आल्या प्रसंगाला चिवटपणे सामोरी  जाणारी. आयुष्याकडून दुसरी कसली अपेक्षा करायची असते हेच माहित नसणारी.  बाहेर जगात दिसणारा झगमगाट, चमचमाट आपल्यासाठी नाहीच हे सहजपणे मान्य  करणारी आणि त्या जगाचे नियम पाळून दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून त्या  झगमगाटासाठी आपले रक्त आटवणारी.&lt;br /&gt;मूल मतिमंद आहे हे सुद्धा तिने किती शांतपणे स्वीकारले! त्याला मात्र सुंदर  वेष्टन असलेले भेटवस्तुचे खोके उघडावे आणि आत काळाकभिन्न जहरिला साप असावा  तसा झटका बसला होता.&lt;br /&gt;का? का? का? त्याने हजारवेळा स्वतःला विचारले असेल. त्याला उत्तर नाही  मिळाले. बायकोच्या कुपोषित शरीराकडे तो पाहायचा तेव्हा त्याचे डोळे भरून  यायचे. तिचे बालपण कसे गेले होते कोण जाणे? कोणी तिच्या वाटेचे अन्न  हिरावले होते? कोणी तिला आणि अशा अनेक मुलांना अर्धपोटी जगण्याची शिक्षा  फर्मावली होती? कोणी?&lt;br /&gt;प्रगतीचा आणि कल्याणाचा डिंडिम वाजवणार्‍या या व्यवस्थेत कोण त्याच्या  मतिमंद मुलाला सुखी आयुष्य देणार होते? आणि का म्हणून? कोणी सगळी सूत्रं  हातात घेतली आणि ठरवले की दुर्बळांनी मरावे हे वाईट आहे आणि त्यांनी  हालाखीचे आयुष्य काढावे हे चांगले आहे? कोणी?&lt;br /&gt;दोन वर्षापुर्वी टिपेस गेलेली त्याची तगमग सुप्त ज्वालामुखीच्या तप्त  लाव्हासारखी त्याच्या मनाच्या तळातून पुन्हा वर उसळली. कपाळावरच्या आठ्या  घट्ट करत तो आत गेला तेव्हा बायको एमआरआय रूममधून बाहेर येत होती. रिपोर्ट  घेऊन दोघे डॉक्टरच्या खोलीत गेले. पडद्यावर फोटो लावून डॉक्टरने पाहिले. मग  वळून औषधे लिहून देऊ लागला.&lt;br /&gt;"मी औषधे बदलून देतो. ही औषधे घेऊन पाहू या काही फरक पडतोय का ते.", डॉक्टर म्हणाला.&lt;br /&gt;त्याने मान हलवली. दोन वर्षे दर महिन्याला अर्धा पगार आणून हॉस्पिटलच्या  घशात ओतूनही हाती काहीच लागलं नव्हतं आणि डॉक्टर अजून पोकळ आशावादाच्या  गोळ्या खिलवत होता. त्याच्या डोक्यातून सणक गेली. खूप ताडताड बोलावं वाटलं  पण वर्षानुवर्षांच्या सवयीने शब्द गळ्यातच विरले. डॉक्टरच्या हातावरचे  मोठ्ठे चकाकते घड्याळ, खिशातला लांब-रुंद मोबाईल, खिडकीच्या बाहेर उभी  असलेली त्याची चकचकीत गाडी फक्त पाहात राहिला.&lt;br /&gt;औषधांची यादी घेऊन निमूटपणे ते निघाले. स्टेशनवर जाताना बायकोकडून त्याने  पोराला घेतले नाही. तो पुढे आणि बायको मागे चालू लागले. गर्दीतून चालताना  पावला-पावलाला त्याच्या डोक्यात सणक जात होती. कचरा, धूळ आणि लोकांनी  भरलेलं ते शहर त्याच्याभोवती फेर धरून नाचतंय असं त्याला वाटू लागलं.&lt;br /&gt;स्टेशनावर जाऊन उभे राहतात न राहतात तोच कुठूनतरी वास लागल्या सारखी लोकल  त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. रोजच्या आठतासांची समिधा घालून आलेल्या  लोकांना गिळून ती ओसंडत होती. एखाद्या टपोर्‍या मांसल अळीने मुंगी गिळावी  तसा तो त्या लोकलमध्ये ओढला गेला. त्याच्यासारख्या कित्येक लोकांनी तो  क्षणार्धात वेढला गेला. आठही बाजूंनी माणसं येऊन त्याला चिकटली आणि लोकल  नवीन शिकार शोधायला निघाल्यासारखी दबा धरून हळूहळू निघाली.&lt;br /&gt;तो एका पायावरून दुसर्‍या पायावर वजन टाकत उभा राहिला. तोंडाच्या अगदी जवळ  तोंड आणून उभे असलेल्यांच्या निर्जीव नजरा टाळून दाराच्या दिसणार्‍या  कोपर्‍यातून बाहेर पाहू लागला. फोडासारख्या तरारलेल्या इमारतींच्या  पार्श्वभूमीवर केसांसारखा दिसणारा विजेच्या तारांचा गुंता, त्यात अडकलेले  निर्जीव झालेले निरागस दुर्दैवी समाधानाचे पतंग, वखवखलेल्या या शहराने  ज्याची दृष्टी आपल्या अखंड आणि प्रचंड गोंगाटाखाली चिरडली असं एखादं  जळालेलं वाघूळ, असंख्य माणसांच्या अमर्याद गरजांसाठीचे भोगसामान  वाहण्यासाठी निर्माण झालेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या, आपल्या खुराड्याच्या  जाळीच्या छिद्राला खिडकी समजून तिच्यात वाळत घातलेल्या आणि पिऊन ओकणार्‍या  गाड्यांच्या धुराने वर ढकललेल्या केविलवाण्या हवेने उडून पडलेल्या  शर्टांपासून ब्रा पर्यंत काहीही दिसेल ते.&lt;br /&gt;दोन स्टेशनांच्या मध्ये त्याला वास आला घाण, कारखान्यांच्या किंवा  माणसांच्या विष्ठेचा. चकाकणार्‍या मेटॅलिक कलरच्या टंच गाड्यांची किंवा  स्लीवलेस ब्लाऊजवर चार बोटं रुंदीचा पदर घेऊन मिक्सरपासून दागिन्यांपर्यंत  काहीही मिरवणार्‍या टंच मॉडेल गृहिणींची किंवा माजाने सुजलेल्या  चेहर्‍यामुळे बारीक झालेल्या डोळ्यांतून टंच सत्तासुंदरीचा हव्यास  गळणार्‍या राजकारण्यांची होर्डिंग्ज मध्येच दिसून त्याच्या डोळ्यांवर आघात  करू लागली. अजस्त्र कारखान्यांच्या अनावर प्रसवशक्तीतून पैदा झालेल्या  वस्तूंची तुम्हाला किती गरज आहे ते सांगणारी होर्डिंग्ज, राक्षसी भोगातच  सुख आहे याची जाहिरात करणारी होर्डिंग्ज, आपल्या अमानवी प्रचारशक्तीनं  माणसाचा हवा तसा चौकोनी ठोकळा बनवणारी होर्डिंग्ज, गिळगिळीत आणि गुळगुळीत  जगण्याशिवाय गत्यंतर नाही हे सांगणारी होर्डिंग्ज, जगण्यापेक्षा जिवंत  राहण्यालाच आयुष्य म्हणणारी होर्डिंग्ज.&lt;br /&gt;प्रत्येक वळणावर विरुद्ध दिशेला घेऊन जाणार्‍या, फुटेस्तवर खाल्लेल्यांना  हाताने भरवणार्‍या, जिवंतपणाचं अवास्तव स्तोम माजवून कोट्यवधी लोकांचं जगणं  हराम करणार्‍या सगळ्या या नरभक्षक व्यवस्थेचा त्याला भयंकर तिटकारा आला.  घशात बोटं घालून सगळे नियम, सगळे संकेत, सगळी जगरहाटी मळमळणार्‍या पोटातून  तिथेच ओकून टाकावी किंवा पुलावरून लोकल जाताना कचर्‍याची भरलेली पिशवी  फेकतात तसं स्वतःला खालच्या गाळात फेकून द्यावं असं त्याला वाटलं. पण आठही  बाजूंनी गर्दीत दाबला गेलेला असताना बोट हलवण्याचंही स्वातंत्र्य आत्ता  नाही या विचाराने, पिसाळलेल्या कुत्र्याच्या मागच्या पायांवरून गाडी जावी  तशी त्याची क्षुब्धता लुळीपांगळी झाली. डोळ्यात तरळलेलं पाणी पापण्यांनीच  टिपायला त्याने डोळे मिटले आणि...&lt;br /&gt;डोक्यावर घणाचा घाव घातल्यासारखा आवाज करत तो स्फोट झाला. त्याचे डोळे आणि  तोंड खाडकन उघडले. कानाच्या पडद्यावर आदळून सर्वभक्षक त्सुनामीसारख्या त्या  आवाजाच्या लाटा त्याच्या यूस्टेशियन नळ्यांतून रोरावत तोंडात आल्या आणि  जीभ, घसा, टाळू, मेंदू सगळं सुन्न होऊन गेले. लोकांनी गच्च भरलेली ती लोकल  झिडपिडत रुळांवरून घसरून थांबली. अंगाचा अवयवही हलवायला जागा नसलेल्या त्या  एकसंध चरबीच्या गोळ्यासारख्या गर्दीत माणसं धडपडली नाहीत, फक्त एकमेकांवर  रेलून दाबली गेली. डब्ब्याच्या भिंतीपाशी उभ्या काही किरकोळ जीवांनी  गुदमरून जगण्याचे नाटक संपवले. बाकीचे लवकरात लवकर पायांवर सरळ उभं राहून  बाहेर पडण्यासाठी वळवळू लागले. उघड्या दारातून धडाधड उड्या मारायला लागले.  "बाँब बॉम्ब," असा जप केल्यासारखा आवाज चारीबाजूनी घुमला. जखमेतून रक्त  वाहावं तशा बाहेर वाहणार्‍या गर्दीबरोबर तोही बाहेर वाहत आला. स्फोटाच्या  आवाजाने त्याच्या कानात अजूनही चुंई वाजत होतं. बाहेर पडल्यावर त्याला  दिसले माणसांचे अवयव, फाटलेली शरीरं, रक्ताची डबकी, जखमी लोकांचे चित्कार  आणि बघ्यांचा कोलाहल. रक्ताच्या दर्शनाने काही भोवळ येऊन पडलेले, काही लोक  त्या प्रेतांमध्ये आपणही आहोत की काय अशी शंका असल्यासारखी उभी असलेले तर  काही स्वतःच्या जिवंतपणावर मनोमन खूश होत तुटक्या फाटक्या शरीरांना  मरणापेक्षाही भयंकर असे जीवन द्यायच्या खटपटीला लागलेले.&lt;br /&gt;एका कडेला उभा राहून तो बायकोच्या साडीचा रंग आठवायला लागला, पोराच्या  झबल्याचा रंग आठवायला लागला. त्याला नक्की आठवले नाही पण दोघांचेही कपडे  लालच असावेत असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला. फुटलेल्या त्या दोन  डब्यांच्या समोरून काही अंतरावरून त्याने सावकाश चालत फेरी मारली. दुरूनच  काही दिसतंय का पाहिलं, चादरीत उचलून नेल्या जाणार्‍या जखमींकडे डोकावून  पाहिलं. त्याला बायको सापडली नाही. दोन्ही डब्यांभोवती दोन-तीन फेर्‍या  मारल्यावर तो कंटाळला. मावळलेल्या सूर्याच्या पश्चात साचणारा अंधार आता  समोरचं उध्वस्त दृष्य गिळू पाहू लागला, पण शहरातले दिवे पेटून त्याला रोखू  लागले. त्या काळवंडणार्‍या दृष्यावर आपल्या तुटपुंज्या प्रकाशाचे डाग पाडून  आणखी भयाण छटा आणायचा कसोशीने प्रयत्न करू लागले.&lt;br /&gt;तो रूळांच्या बाजूला असलेल्या टेकाडावर झुडपाशेजारी बसला. तिथं दिव्यांचा  प्रकाश पोचत नव्हता. खिशातून सिगारेट काढून शिलगावली. त्या शहराच्या  अविनाशी दुर्गंधीपुढे त्या धुराचा वास त्याला हवाहवासा वाटला. रिकाम्यापोटी  दोन कडक झुरके मारल्यावर त्याला गरगरलं आणि चहूबाजूंनी दाटलेल्या अंधारात  गजबजलेल्या जगात आता आपण अगदी एकटे आहोत अशी भावना त्याच्या आवळलेल्या  पोटातून कारंज्यासारखी थुईथुई उडू लागली. एकटा. स्वतंत्र. आतापर्यंत खुरडत  खुरडत इथवर ओढत आणलेलं हे आयुष्याचं ओझं फेकून द्यायला किंवा दूर  डोंगराच्या कुशीत किंवा समुद्राच्या कडेवर निरीच्छ जगायला किंवा ज्या  व्यवस्थेने जगणे अवघड करून ठेवले तिच्यातल्या पळवाटा शोधायला, उन्मुक्तपणे  शरीराचे चोचले पुरवायला, मनाच्या इच्छा ओरबाडून का होईना पूर्ण करायला. तो  स्वतंत्र झालेला होता. त्याला आनंद वाटला नाही पण मोकळं वाटलं. कॉलेजच्या  दिवसात असायचा तसा बिनधास्तपणा त्याच्या झुरक्यात आला. वर बघून आकाशाच्या  तोंडावर धूर सोडताना त्याला शांत शांत वाटलं. तो आता कोणालाही काहीही देणं  लागत नव्हता. ज्यांनी हा निरर्थक जन्म दिला ते, ज्यांच्याशी इच्छा नसताना  आणि प्रयत्न करूनही तुटत नाहीत असे मनाचे नाजूक तंतू जोडले गेले ते सगळे  नाहीसे झालेले होते. आता फक्त तो आहे आणि ही समोरची गर्दी. त्या गर्दीतल्या  जंतूंशी मनसोक्त खेळ करायला, वापरून घ्यायला, सूड घ्यायला आणि नंतर मन  भरलं की त्या बजबजपुरीतून निघून जायला तो मोकळा होता.&lt;br /&gt;त्याने सिगारेट विझवली आणि उभा राहून खिशात हात घालून चालू लागला. गर्दी  अजून वाढत चाललेली. आता पोलीस आणि फायरब्रिगेडच्या गाड्या आलेल्या त्याला  दिसल्या. जखमींना आणि मेलेल्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलं जातंय ते  ओरडून सांगितलं जात होतं. बायकोला आणि पोराला हॉस्पिटलात नेलं असेल असं  त्याला वाटलं. त्याने खिशातून हात काढले. शांत वाटणारा त्याचा चेहरा  सुकलेल्या चिकूसारखा आक्रसला, सैलावलेल्या खांद्यांनी हळूहळू नकळत गोलाई  धारण केली आणि त्याचं शरीर पुन्हा खांद्याला पट्टा लावून मागे काहीतरी जड  ओढत चालल्यासारखं दिसू लागलं.&lt;br /&gt;तो हॉस्पिटलमध्ये आला. बाहेर पोर्चमध्ये अ‍ॅम्बुलन्स ठणाणा करत येजा करत  होत्या, माणसं आकांत करत किंवा मेल्या डोळ्यांनी बघत उभी राहिलेली. तो आत  गेला. रांगेने ठेवलेल्या मृतदेहांसमोरून चालत गेला. करपलेले, तुटलेले ते  मृतदेह पाहून त्याला किळस आली नाही. वाईटही वाटले नाही. तिथेही त्याला  बायकोपोरासदृष काही दिसलं नाही. आजूबाजूला रडणार्‍या, भांबावलेल्या  लोकांमधून वाट काढत त्याने आणखी आत जाऊ पाहिले. पण एका पोलीस हवालदाराने  त्याला अडवले, पण तितक्यात दुसर्‍या घुसणार्‍या माणसाला अडवायला हवालदाराला  दुसरीकडे पाहावे लागले. तो अलगद आत गेला. जिवंतपणाचे रक्षक डॉक्टर आणि  नर्स पांढर्‍या कपड्यांमध्ये धावपळ करताना त्याला दिसले. जखमी लोकांना  तातडीने मलमपट्टी केली जात होती. इथेही जखमी लोकांना रांगेत ठेवलेलं होतं.  सगळे एकजात सारखे दिसत होते, बाहेरच्या रांगेतल्या सारखेच. नाकातून  आत-बाहेर करणारी हवा एवढाच काय तो फरक. त्याने वॉर्डभर संथपणे नजर फिरवली.  एका कोपर्‍यातून पुढे जाऊन त्याची नजर थांबली आणि पुन्हा वळली. एका  स्ट्रेचरवर एक बाई पडलेली त्याला दिसली. उजवा पाय तुटलेली. तिच्या पलीकडे  तिच्या पोटातून वर आल्यासारखं दिसणारं एक छोटंसं डोकं. त्याच्या हृदयाने एक  ठोका आवळून धरला. घसा कोरडा होऊन आत ओढला गेला. नकळत त्याने स्वतःला तिकडे  ढकलले. पाय घासत जवळ पोचतानाच त्याला पोराचे मंगोल डोळे दिसले. फतकल मारून  ते मंदपणे स्वतःच्याच हाताशी खेळत होतं. त्याला काहीही जखम झालेली त्याला  दिसली नाही. जणू त्याचा मतिमंदपणा त्याचं आयुष्य मरणप्राय करण्यासाठी  नियतीला पुरेसा वाटला होता. त्याची नजर बायकोच्या भाजलेल्या हातांवरून  फिरली. जखमांनी आणखी विद्रूप झालेल्या चेहर्‍यावरून गेली आणि छातीवर  स्थिरावली. तिची छाती वरखाली होतेय की नाही ते त्याला ठरवता आलं नाही. एकटक  निरखून पाहताना मात्र त्याला काहीतरी कळत गेलं आणि त्याची नजर पाण्यात  विरघळू लागली. त्याच्या पायातली शक्ती निघून गेल्यासारखा तो मटकन खाली बसला  आणि स्वतःचे केस मुठीत गच्च धरून ओठ आवळत गदगदून रडू लागला.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-6191391179476014200?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/6191391179476014200/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2012/02/blog-post.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/6191391179476014200'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/6191391179476014200'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2012/02/blog-post.html' title='जन्मठेप'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-6604366333487094730</id><published>2011-12-20T02:04:00.000-08:00</published><updated>2011-12-20T02:04:07.168-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्तक'/><title type='text'>भविष्याला आपली गरज आहे का?</title><content type='html'>'पृथ्वी वाचवा' ही घोषणा बर्‍याच लोकांना विनोदी वाटते. मलाही वाटते. शिवाय 'पृथ्वी' वाचवण्यासाठी लोकांना सुचवले जाणारे उपायही बरेच गमतीदार आहेत. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणे, घरातले दिवे विनाकारण लावून न ठेवणे किंवा घरात पाणी जपून वापरणे वगैरे. काहीतरी बिघडलंय आणि हे असे उपाय केल्याने बराच फरक पडेल अशी समजूत असलेले भाबडे लोक ते उपाय प्रामाणिकपणे करतही असतील. या 'पृथ्वी वाचवा' वरून एक व्हिडिओ पाहिल्याचे आठवले, तो इथे डकवण्याचा मोह आवरत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;iframe allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="http://www.youtube.com/embed/eScDfYzMEEw" width="420"&gt;&lt;/iframe&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पृथ्वी वाचवायची गरज असो वा नसो, मानवाने स्वतःला वाचवण्याची गरज आहे यावर बर्‍याच लोकांचे आजकाल एकमत झालेले दिसते. मानवजात नष्ट व्हायचा धोका आहे वगैरे बरेच शास्त्रज्ञही मासिकांमध्ये खळबळजनक विधाने करत असतात (खळबळ होत नाही ही गोष्ट वेगळी). पर्यावरणवाद्यांचा आणि तंत्रभीतांचा (Luddites) तर हा एक आवडीचा विषय आहे. गेल्या दोन-अडीचशे वर्षांत औद्योगिकीकरणामुळे झालेला पर्यावरणाचा र्‍हास, तपमानवाढ, लोकसंख्येचा विस्फोट, अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष्य, आण्विक युद्धे आणि अगदी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल, सौर वादळे इत्यादीपर्यंत अनेक कारणे दिली जातात. यातली सौर वादळे, उल्कापात वगैरे नैसर्गिक कारणे सोडली तर बाकीची सगळी मानवनिर्मित आहेत असे म्हटले जाते आणि हा तंत्रज्ञानाने साधलेल्या प्रगतीवर मोठा आरोप आहे. एकीकडे तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांमुळे मानवी आयुष्य खूपच सुखकर झाले आहे, प्रदीर्घ झाले आहे असे विविध आकडेवारीने सांगितले जात असताना दुसरीकडे अमुक एक टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, अमुक इतके लोक उपाशी आहेत, अमुक अब्ज लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही अशीही आकडेवारी कानावर येत असते. एकीकडे सगळ्यांना शिक्षण, कामधंदा वगैरे देऊन सगळ्या जगातल्या लोकांचे जीवनमान सारखे करण्याची धडपड आणि दुसरीकडे मानवाच्या स्वच्छंद नैसर्गिक जीवनावर घाला येत असल्याची बोंब. एकीकडे लोकसंख्या भयानक वाढतेय आणि लोकांना उपाशी मरावं लागेल असा आकांत तर दुसरीकडे लोकसंख्येच्या वाढीचे आलेख काढून ती कशी स्थिर होईल हे सिद्ध करण्याची धडपड. हे सगळं पाहून नक्की काय चाललंय हे कळेनासं होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझा स्वतःचा स्वभाव अत्यंत आळशी असल्याने तंत्रज्ञानामुळे आयुष्य सुकर झाले आणि प्रचंड प्रमाणावर श्रमबचत झाली वगैरे गप्पांवर विश्वास नाही. उलट जितकी तंत्रज्ञानात प्रगती होईल तितकी भोगस्पर्धा आणि त्यामुळे कामाचे तास वाढलेलेच दिसतात. तरीही होताहोईतो तटस्थ राहून मी उत्तरे शोधण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वर्तमानात खरोखर आपण म्हणतो तसा नैसर्गिक साधनसंपत्तीचा भरमसाठ वापर होतोय की नाही आणि खरंच नैसर्गिक स्त्रोत संपत आले आहेत का हे शोधताना मला &lt;a href="http://www.blogger.com/=http://www.footprintnetwork.org/en/index.php/GFN/" target="_blank"&gt;Global Footprint Network&lt;/a&gt; बद्दल माहिती मिळाली. ही संघटना पर्यावरणाचं अकाऊंटिंग करून मानवी उपभोगाचा नैसर्गिक स्त्रोतांवर कितपत परिणाम होतो याची आकडेवारी काढते. सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी "Earth Overshoot Day" 'साजरा' केला. म्हणजे २०११ या एका वर्षात जितकी साधनसंपत्ती तयार झाली असती ती सप्टेंबर महिन्यातच वापरली गेली हे जाहीर केलं. त्यांच्या &lt;a href="http://www.blogger.com/=http://www.footprintnetwork.org/en/index.php/GFN/blog/today_is_earth_overshoot_day1"&gt;ब्लॉगवर&lt;/a&gt; तो लेख वाचता येईल.आता हे पाहून कोणालाही अशी शंका येईल की माणसाच्या उद्योगांचा निसर्गावर परिणाम होतोय हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले की काय? तशी ती मलाही आली आहे, पण अजून तसे म्हणण्यासाठी कोणाकडून मान्यता मिळायला पाहिजे ते मला महित नाही. त्यांच्या संस्थळावर त्यांनी लोकसंख्येचे अंदाज दिले आहेत. विशेष काहीही घडले नाही आणि जसे चालले आहे तसेच चालत राहिले तर २०५० साली लोकसंख्या ९ अब्ज असेल असा अंदाज त्यांनी बांधला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याचदरम्यान UNO च्या Food and Agriculture Organization (FAO) चा &lt;a href="http://www.blogger.com/=http://www.fao.org/news/story/en/item/95153/icode/"&gt;एक अहवाल&lt;/a&gt; प्रसिद्ध झाला. त्यातही २०५० साली ९ अब्ज लोकसंख्या असेल असा अंदाज केला गेला आहे. या ९ अब्ज लोकसंख्येसाठी सध्याच्या अन्नधान्य उत्पादनात ७०% वाढ झाली पाहिजे, त्यातच उपलब्ध शेतजमिनीपैकी २५% जमीन निकामी झाली आहे, ८% अर्धवट निकामी आणि १०% सुधारत आहे असे आव्हानात्मक प्रश्न उभे केले आहेत. अर्थातच नव्या तंत्रज्ञानामुळे आणि सुधारित पद्धतींमुळे आपण हे आव्हान पेलू शकू असा विश्वासही व्यक्त केलाच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग हे नवे तंत्रज्ञान म्हणजे काय ते शोधणे आले. उत्तर थोडेसे माहितीतलेच होते. पाण्याचा अतिकिफायतशीर वापर आणि जेनेटिक्स. जेनेटिक्समधील वाईड क्रॉसिंग, सेल/टिश्यू/प्रोटोप्लास्ट कल्चर आणि सोमॅटिक सेल हायब्रिडायझेशन अशा तंत्रांची भारदस्त नावं वाचता वाचता जेनेटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्स या तीन क्षेत्रात प्रचंड वेगाने होत असलेल्या प्रगतीबद्दल कुणकुण लागली. (&lt;a href="http://www.blogger.com/=http://www.foresight.org/"&gt;http://www.blogger.com/=http://www.foresight.org/&lt;/a&gt;). Molecular Manufacturing आणि cell computing वगैरे भन्नाट विषय पाहून हतबुद्ध झालो आणि तशाच अवस्थेत &lt;a href="http://www.blogger.com/=http://www.singularitysummit.com/summit/what_is_the_singularity"&gt;Singularity&lt;/a&gt; या नवीनच संकल्पनेशी ओळख झाली. सिंग्युलॅरिटी समिटच्या संस्थळावर महिती तंत्रज्ञानातल्या चढत्या भाजणीत होणार्‍या वाढीबद्दल माहिती देणारी रे कर्झ्विल यांची एक चित्रफीत पाहण्यात आली. रे कर्झ्विल यांच्या मते या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ही सिंग्युलॅरिटी २०२९ सालापर्यंत गाठता येईल. त्यानंतर काय होईल हे सांगणे अवघड असले तरी माणसाने आपल्यापेक्षा कित्येकपटींनी बुद्धिमान असे यंत्र तयार केले असेल एवढे नक्की. असे हे यंत्र स्वतःपेक्षाही जास्त बुद्धिमान यंत्रं तयार करू शकेल आणि 'बुद्धिमत्तेचा स्फोट' होईल. या बुद्धिमत्तेच्या स्फोटापुढे माणसाचे सध्याचे प्रश्न अगदीच किरकोळ असतीलच शिवाय खुद्द माणसाची बुद्धिमत्ताही खूपच किरकोळ असेल. आता यावरही दुसर्‍याच दिशेने विचार करणारे महाभाग आहेतच. सन मायक्रोसिस्टीम्सचे संस्थापक आणि प्रमुख संशोधक, जावा या प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या रचनेचे तपशील लिहीणारे श्री. बिल जॉय यांनी लिहीलेला एक लेख (&lt;a href="http://www.blogger.com/=http://www.wired.com/wired/archive/8.04/joy.html?pg=1&amp;amp;topic=&amp;amp;topic_set="&gt;Why The Future Does Not Need Us&lt;/a&gt;) या बाबतीत अतिशय उद्बोधक ठरावा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सगळं पाहून डोकं गरगरायला लागलं आणि "Man moves in mysterious ways his problems to resolve." यातल्या पहिल्या भागाबद्दल खात्री पटली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण दुसर्‍या भागाचं काय? तुम्हाला काय वाटतं? माणसाचे प्रश्न सुटतील? की आणखी वाढतील? वाढणार असतील तर उपाय काय?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-6604366333487094730?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/6604366333487094730/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/12/blog-post_20.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/6604366333487094730'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/6604366333487094730'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/12/blog-post_20.html' title='भविष्याला आपली गरज आहे का?'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://img.youtube.com/vi/eScDfYzMEEw/default.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-4193986424155564439</id><published>2011-12-19T04:00:00.000-08:00</published><updated>2011-12-19T04:08:11.153-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्तक'/><title type='text'>सरासरी अंधश्रद्धा</title><content type='html'>सरासरी अंधश्रद्धेबद्दल लिहीण्याआधी एक गोष्ट सुचली ती सांगतो. फार पुर्वीची नाही, नेहमीचीच गोष्ट आहे. एकदा एक राजा होता. प्रजेच्या कल्याणासाठी दक्ष वगैरे. वर्षाअखेरीस त्याची प्रधान मंत्र्याशी खास चर्चा असायची. वर्षभराच्या कामगिरीच्या मूल्यमापनाची. तशी ती यावर्षीही ठरली. एकेका खात्याच्या कामगिरीचा सारांश महामंत्री सांगणार आणि राजा त्यावर विचार, टिप्पणी करून त्या खात्याच्या मंत्र्याला बक्षिस किंवा सूचना काय द्यायच्या ते सांगणार अशी पद्धत. समोरासमोर ठेवलेल्या मंचकांवर राजा आणि महामंत्री बसलेले आणि मध्ये ठेवलेल्या मेजावर गेल्या आणि यावर्षीच्या माहितीपत्रांची भेंडोळी. राजाच्या दरबारात नवीनच लागलेला विदूषक एका कोपर्‍यातल्या आसनावर उत्सुकतेपोटी बसलेला . तसं इथे त्याचं काही काम नाही. इथे सगळं कसं गंभीर. कृषीमंत्र्यांच्या माहितीने कामकाजाची सुरुवात झाली. कृषी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं खातं ना! बाकी कोणी कितीही टिमक्या वाजवल्यातरी शेवटी पोटाची खळगी भरण्याच्या या उद्योगातूनच बाकी सगळा डोलारा उभा राहिला आहे हे सगळ्यांनाच माहित असतं. तर, महामंत्री सांगू लागले आणि राजा ऐकू लागला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"महाराज, यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.", महाराजांच्या चेहर्‍यावर काळजीच्या रेषा. "तरीही गेल्यावर्षीपेक्षा दहा टक्के जास्त धान्योत्पादन झाले. आकडेवारीनुसार सडून वाया गेलेलं धान्य सोडूनही दरडोई सरासरी शंभर शेर धान्य निर्माण झाले. म्हणजे दरडोई दरमहा आठ शेर."&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजा प्रसन्न. कृषीमंत्र्यांना आठ गावं बक्षिस. पुढे अर्थमंत्री. "महाराज, यावर्षी आपल्या राज्याचं एकूण उत्पन्न आठ टक्क्यांनी वाढलं आणि वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊनही दरडोई उत्पन्न पन्नासहजारांवरून साठहजारांवर गेलं."&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजा खूश. अर्थमंत्र्यांना दहा गावं बक्षिस. अशी एकेक माहिती प्रधानमंत्री सांगत गेले. बैठक संपली तेव्हा राजा प्रसन्न होता. राज्यातल्या लोकांना जास्तीचं अन्नधान्य मिळतंय, जास्तीचं उत्पन्न मिळतंय, लोक जास्ती जगताहेत वगैरे गोष्टी ऐकून कोणता राजा प्रसन्न होणार नाही?&lt;br /&gt;&lt;br /&gt;महामंत्र्यांना निरोप देऊन त्याने पेंगणार्‍या विदूषकाकडे मोर्चा वळवला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"उठ झोपाळा, गोष्ट सांगिशी मला", राजा हसून म्हणाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"क्षमा महाराज, तुमच्या राज्यात हे जास्तीचं अन्न खाऊन अशी जास्तीची झोप येते बघा", विदूषक म्हणाला," आणि गोष्ट तुम्हाला तुमचीच सांगतो. फार जुनी नाही, पुढच्या महिन्यातल्या पंधरा तारखेला घडलेली. सांगून झाल्यावर तुम्हाला नक्की आठवेल अशी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर, झालं काय महाराज, की जास्तीच्या उत्पन्नाचे आभार म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी जेवायला बोलावलं. मी स्वतः पाटावर बसलो आणि चौरंगावर तुम्हाला बसवलं. तितक्यात दारी एक गरीब ब्राह्मण अतिथी आला. त्यालाही आत घेतलं आपल्या बाजूला जमिनीवर बसवलं. तुमच्या आवडीच्या जिलब्यांचा बेत केला होता. एकावन्न जिलब्या केल्या होत्या, पण तुम्ही पहिला भात संपवता संपवता त्या बुभुक्षित ब्राह्मणाने पन्नास जिलब्या खाल्ल्या आणि मी एक जिलबी खाल्ली. नाईलाजाने तुम्ही बाकीचं जेवण जेवलात आणि हात धुतलेत. मुखशुद्धी करून थोडा आराम करून तुम्ही जायला निघालात तेव्हा मी नम्रपणे विचारलं 'महाराज, जिलब्या छान झाल्या होत्या नाही?' ते ऐकून तुम्ही रागाने लालबुंद झालात आणि काहीही न बोलता ताडताड निघून गेलात. मला दु:ख तर खूपच वाटले महाराज पण आश्चर्य या गोष्टीचे अधिक वाटले की आपण प्रत्येकी सरासरी सतरा जिलब्या खाऊनही तुम्ही असं का वागलात?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता ही गोष्ट ऐकून संख्याशास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रांध असे दोन्ही लोक त्यात चुका काढतील किंवा संख्याशास्त्र हे फक्त एक निदर्शक म्हणून वापरले पाहिजे आणि सरासरी शिवाय इतरही मोजमापे (median, mode) आहेत वगैरे सांगतीलच आणि त्यांचं बरोबर आहे यात शंका नाही. पण तरीही याच सरासरीचा आधार घेऊन बरेच मुद्दे सिद्ध केले जातात आणि तेव्हा हा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात नाही. वरच्या गोष्टीत घेतलेले मुद्देच पाहा ना! गेल्या पन्नास-साठ वर्षात आपण प्रचंड प्रगती केली असे म्हणतो. या प्रगतीचे मापन करणारे निर्देशक बहुतांश संख्यात्मक आहेत आणि त्यातले बरेचसे सरासरीवर आधारित आहेत. शिवाय या निर्देशकांना आधारभूत अशी काही गृहीतके आहेत आणि ती गृहीतके बरोबर धरली तरच त्या निर्देशकांना हवा तो अर्थ प्राप्त होतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;उदा. दोनशे वर्षांपूर्वी असलेली सरासरी जन्मतः जीवनशक्यता ३१ वर्षां वरून आता ६७ वर्षांवर गेली आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या देशांमध्ये ती ७५-८० वर्षांच्या पुढे असते, विकसनशील देशांमध्ये ६०च्या आसपास असते आणि मागासलेल्या देशांमध्ये ४०च्या खाली असते (&lt;a href="http://www.worldlifeexpectancy.com/"&gt;संदर्भ&lt;/a&gt;) शिवाय या निर्देशकासाठी गृहीतक असे आहे की जन्माला आलेला जीव दुबळा असो वा सशक्त, तो जगला पाहिजे आणि अनेक अपत्यांपैकी सशक्त ती जगतील आणि दुबळी मरतील हा निसर्गातल्या सामान्य नियम चुकीचा आहे. वस्तुतः अगदी ७५-८० जीवनशक्यता असलेल्या भागातही प्रत्येक माणूस ७५-८० वर्ष जगतो असे नाही. याचाच अर्थ आपण फक्त दुबळेपणा आणि सशक्तपणा यांच्या नैसर्गिक व्याख्या बदलून त्या कमी तीव्र केल्या आहेत आणि याचा परिणाम म्हणजे गेल्या पन्नास-साठ वर्षांत तिप्पट झालेली लोकसंख्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर, ही सरासरी अंधश्रद्धा म्हणजे संख्याशास्त्रीय निर्देशक वापरून, एखाद्या गोष्टीचे फक्त संख्यात्मक मूल्यमापन करून आणि गुणात्मक बाबींकडे पूर्णत: दुर्लक्ष करून त्या गोष्टीबद्दल छातीठोकपणे बोलणे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बहुधा तंत्रज्ञानातली प्रगती, त्याचा पर्यावरण आणि मानवी जीवनावरचा परिणाम यावर चर्चा होत असताना तंत्रज्ञानाची बाजू घेणार्‍यांना हे निर्देशक फार उपयोगी पडतात. धडाधड प्रतिपक्षावर संख्या आणि आलेख यांचा मारा केला जातो आणि तंत्रज्ञानामुळे गेल्या पन्नास वर्षांत माणसाचे आयुष्य किती सोपे-सुकर झाले आहे हे पटवून दिले जाते. तेव्हा या निर्देशकांचा वापर करताना असा अविर्भाव आणला जातो की बहुसंख्यांचे कल्याण झालेच आहे आणि थोडेफार उरले आहेत त्यांचे लवकरच होईल. वस्तुस्थिती मात्र त्याच्या उलट आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तंत्रज्ञानाच्या विकासामुळे काही लोकांचे आयुष्य सोपे झाले असले तरी बहुसंख्यांचे आयुष्य कठीणच आहे. बहुतेकांवर आयुष्य लादले गेले आहे आणि बहुतेकांवर ते कसे जगायचे याची पद्धतही लादली गेली आहे. एक हरितक्रांती होऊनही अजूनही एक तृतीयांश लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. गमतीचा भाग म्हणजे अश्मयुगात माणसाला पुरेसे अन्न मिळत नसे असे (चुकीने) समजले जाते पण सध्याच्या उपाशी लोकांची संख्या अश्मयुगातल्या एकूण लोकसंख्येपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे (म्हणजे जन्मतःच किंवा बालपणी लवकर मरणारे जास्त दु:खी की उपाशी अवस्थेत खुरडत खुरडत जगून मरणारे जास्त दु:खी हा गुणात्मक वाद आला). &lt;br /&gt;&lt;br /&gt;आणखी एक गोष्ट अशी की हे निर्देशक वापरून त्यात होणारी सुधारणा म्हणजे मानवी जीवनाच्या दर्जातल्या सुधारणेची निदर्शक आहे असे सध्या आपण म्हणू शकतो. परंतु जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसे या निर्देशकांमधली सुधारणा खरोखर मानवी आयुष्याच्या दर्जातली सुधारणा असेलच असे नाही. (वर दिलेल्या दुव्यात विवेचन केलेला आत्महत्यांचा प्रश्न बहुतेकांना रोचक वाटेल. ) &lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्याप्रमाणे बहुतेकवेळा शेअरमार्केटच्या निर्देशांकाचा अर्थव्यवस्थेच्या स्थितीशी संबंध असेलच असे नाही त्याचप्रमाणे हे संख्याशास्त्रीय निर्देशांक वस्तुस्थितीचे यथार्थ प्रकटन करतीलच असे नाही. म्हणूनच तंत्रज्ञानातली घोडदौड आणि तिचा पर्यावरण व मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा उहापोह करण्याआधी या निर्देशकांचा समाचार घेणे आवश्यक आहे असे मला वाटते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-4193986424155564439?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/4193986424155564439/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/12/blog-post_19.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/4193986424155564439'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/4193986424155564439'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/12/blog-post_19.html' title='सरासरी अंधश्रद्धा'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-6840897811757313318</id><published>2011-12-18T20:44:00.000-08:00</published><updated>2011-12-18T20:44:55.846-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>आवंढा</title><content type='html'>मेच्या पहिल्या आठवड्यातला शुक्रवार. भडभुंज्यांच्या कढईत तापवल्यासारख्या गरम मातीतून सायकल मारत घरी आलो. माणसं सगळी घरांच्या सावलीत गुमान पडलेली. गल्लीतली कुत्रीसुद्धा हातपंपाच्या आजूबाजूला गारवा शोधत वीतभर जिभा काढून धपापत बसलेली. अधूनमधून छोट्याशा झुळकींचे भोवरे धुळीची चादर विस्कटत असले तरी त्यात हवेपेक्षा उन्हाच्या झळाच जाणवत होत्या. पाठीला घामाने शर्ट चिकटलेला असला आणि उन्हाने चेहरा रापला असला तरी मला आतून गार गार वाटत होतं. इंजिनिअरिंगची शेवटची परीक्षा संपली होती आणि चांगली गेली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सराईतपणे सर्रकन उघड्या फाटकातून सायकल आत नेली आणि तसाच मागच्या मागे उतरून अलगद भिंतीला जाऊन टेकू दिली. धडधडत व्हरांड्यात जाऊन आईला हाक मारणार तोच भानावर आलो आणि मग आवाज न करता हलक्या पायांनी घरात शिरलो. घरात शांतता होती आणि आतल्या अंधाराला डोळे सरावायला थोडा वेळ लागला. हळू हळू दबक्या पावलांनी पुढच्या खोलीतून मधल्या खोलीत गेलो. आई अपेक्षेप्रमाणे जराशी पडली होती आणि तिचा डोळा लागला होता. तिची झोपमोड न होऊ देता तिथून स्वयंपाकघरात आणि तिथून मागच्या दारात आलो. माझ्या चाहुलीने दाराशेजारच्या नळावर बसलेल्या दोन चिमण्या भुर्रकन उडाल्या आणि पारिजातकावर जाऊन बसल्या. धुण्याच्या दगडावर पोट टेकवून पहुडलेल्या मांजरीने एक डोळा उघडून पाहिलं आणि कुंपणाच्या भिंतीवर बसलेला कावळा उडून गेला. कडुनिंबाखाली टाकलेल्या झोपाळ्यावर बसलेल्या चिमी-ठमीला मात्र काहीच पत्ता लागला नाही. वेण्यांचे लांब-जाड शेपटे पाठीवरून मागे टाकून दोघी हळुवारपणे झोके घेत पुस्तकांच्या आडून खुसपुसत होत्या. काय एवढ्या गप्पा रंगल्या होत्या कोण जाणे?&lt;br /&gt;पाय न वाजवता थोडासा झुकुन पुढे गेलो आणि बैलांच्या वेसणी धराव्या तशा त्यांच्या वेण्या दोन हातात दोन धरून खेचल्या.&lt;br /&gt;"आऊच..आईगं",नाजूकपणे दोघी कळवळल्या आणि मी वेण्या सोडून हसत उभा राहिलो.&lt;br /&gt;"दादिटल्या खादिटल्या," चिमी ओरडली आणि पुस्तक घेऊन मारायला मागं आली. झोपाळ्याभोवती दोन-तीनदा तिला हुलकावण्या दिल्यावर रागाने फुसफुसत पुन्हा झोपाळ्यावर धपकन बसली.&lt;br /&gt;"जा चिमे, मला जेवायला वाढ", मी म्हणालो.&lt;br /&gt;"अडलंय माझं खेटर. स्वतःच्या हाताने वाढून घेता येत नाही का?", चिमी नाक उडवत म्हणाली.&lt;br /&gt;"जा नाहीतर मी आईला उठवीन हां."&lt;br /&gt;दोन सेकंद माझ्याकडे मारक्या म्हशीसारखं बघून चिमी उठली. "चल गं ठमे", असं म्हणून दाणदाण पाय आपटत आत गेली. ठमी गेली नाही. खाली बघत मंद हसत हातातल्या मिटलेल्या पुस्तकावर बोट फिरवत बसली.&lt;br /&gt;मी कडुनिंबाला टेकून उभा राहिलो. तिच्या सावळ्या गोल चेहर्‍याकडे, खाली झुकलेल्या लांब लांब पापण्यांकडे आणि आता खांद्यावरून पुढे घेतलेल्या वेणीकडे पाहात राहिलो.&lt;br /&gt;"बन्या म्हणाला तुला बघायला येताहेत उद्या?", मी विचारलं.&lt;br /&gt;तिने पापण्या उचलून वर पाहिलं. मी नजर चुकवून जांभळीच्या पानांमध्ये मोहोर शोधू लागलो.&lt;br /&gt;"हो येताहेत ना. श्रीरामपूरचे लोक आहेत."&lt;br /&gt;मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. ती पुन्हा खाली बघून मंद हसत पुस्तकावर बोट फिरवत होती.&lt;br /&gt;"मोठी तालेवार पार्टी आहे म्हणे?", मी मिश्कीलपणे म्हणालो.&lt;br /&gt;"हो, आहेच्च मुळी," तिने तिरप्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. तिचं हसू आता रुंदावलं होतं, " ट्रान्सपोर्टचा बिझीनेस आहे. पंचवीस ट्रक आहेत म्हणे."&lt;br /&gt;का कोण जाणे, पण मला कशाचातरी खूप राग आला. मी नजर पुन्हा जांभळीच्या पानांमध्ये खुपसली.&lt;br /&gt;"असेना का. आम्हाला काय फरक पडतो?", तिच्याकडे न पाहताच मी म्हणालो, " आम्ही काय, तुझ्या लग्नात जेवणावर उभा-आडवा हात मारणार आणि तुझा नवरा तुला ट्रकमध्ये घालून न्यायला लागला की खाली उभं राहून तुला टाटा करणार. अर्थात तू आम्हाला लग्नाला बोलावलं तर... बोलावणार ना?"&lt;br /&gt;काही उत्तर आलं नाही म्हणून मी मान वळवून तिच्याकडे पाहिलं. तिची नजर खालीच झुकलेली राहिली. चेहर्‍यावरचं हसू मात्र मावळलं होतं. मला बरं वाटलं.&lt;br /&gt;पुस्तक सोडून आता ओढणीशी वेगाने चाळा करणार्‍या तिच्या नाजूक, लांब बोटांकडे पाहून मी आणखी चेव आल्यागत म्हणालो,"ठमेऽऽ, काय म्हणतोय मी? बोलावणार ना लग्नाला?"&lt;br /&gt;तिने झटकन वर पाहिलं. इतकावेळ हसणार्‍या तिच्या टपोर्‍या काळ्या डोळ्यांमध्ये पाणी डबडबलं होतं आणि डोळ्यांच्या गुलाबी कडा लालसर होऊन पापण्या भिजल्या होत्या.&lt;br /&gt;"ठमे...", मी चरकलो.&lt;br /&gt;ती तटकन् उठून उभी राहिली आणि माझ्याकडे न पाहता, काहीही न बोलता तरातरा चालू लागली.&lt;br /&gt;"ठमे....मेहरुन्निसा..", माझ्या घशातून अस्पष्ट शब्द उमटले.&lt;br /&gt;मला मोठ्याने हाक मारून तिला थांबवायचं होतं, पण घशात इतका मोठा आवंढा आला की डोळ्यातून पाणीच आलं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-6840897811757313318?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/6840897811757313318/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/12/blog-post.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/6840897811757313318'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/6840897811757313318'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/12/blog-post.html' title='आवंढा'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-4283670367715580706</id><published>2011-05-06T01:26:00.000-07:00</published><updated>2011-05-06T01:26:07.565-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>जर तू असता तर</title><content type='html'>जर तू असता तर&lt;br /&gt;तुला दिसले असते&lt;br /&gt;सुरे घेतलेले हात&lt;br /&gt;कल्ले कापलेलं शरीर&lt;br /&gt;निळ्याशार पाण्यातला लाल ढग&lt;br /&gt;तुला दिसले असते&lt;br /&gt;अजस्त्र शरीरावरचे&lt;br /&gt;निर्जीव भासणारे डोळे&lt;br /&gt;दिसलीही असती त्यात वेदना&lt;br /&gt;पण नसती दिसली दया याचना&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जर तू असता तर&lt;br /&gt;तुला दिसले असते&lt;br /&gt;काळे पिवळे पट्टे&lt;br /&gt;आणि त्यावर लाल जखमा&lt;br /&gt;भेदरलेले गोड बछडे&lt;br /&gt;आणि जमिनीवर आपटलेली शेपटी&lt;br /&gt;दिसले असते तुला&lt;br /&gt;थंड भासणारे हिरवे-पिंगट डोळे&lt;br /&gt;क्रोधाचा पेटलेला त्यात वणवा&lt;br /&gt;पण तुझ्या प्रार्थनेची वानवा&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जर तू असता तर&lt;br /&gt;तुला दिसले असते&lt;br /&gt;कुर्‍हाडीचे घाव सोसणारे&lt;br /&gt;महाकाय मूक वृ़क्ष&lt;br /&gt;चूड घेतलेल्या हातांनी&lt;br /&gt;पेटवलेले भीषण वणवे&lt;br /&gt;उघडे बोडके डोंगर&lt;br /&gt;त्यावरचे तुझे मंदिर&lt;br /&gt;आणि हातापाया न पडता&lt;br /&gt;समोर कोसळणारी झाडे&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जर तू असता तर&lt;br /&gt;तुला दिसले असते&lt;br /&gt;क्षुद्र मुके जीव&lt;br /&gt;मानाने जगणारे&lt;br /&gt;मरण येईपर्यंत&lt;br /&gt;आयुष्याशी झगडणारे&lt;br /&gt;जर तू असता तर&lt;br /&gt;उचलले असतेस तुझे&lt;br /&gt;चक्र, वज्र, त्रिशूळ, तलवार&lt;br /&gt;आणि छाटली असतीस समोरची&lt;br /&gt;झुकलेली मुंडकी लाचार&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-4283670367715580706?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/4283670367715580706/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/05/blog-post.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/4283670367715580706'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/4283670367715580706'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='जर तू असता तर'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-2959778410327763189</id><published>2011-04-19T06:47:00.001-07:00</published><updated>2011-04-19T06:49:41.497-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>भिऊ नकोस ...</title><content type='html'>फुलपाखरांमागे धावताना, कधी झोक्यावर हिंदोळताना&lt;br /&gt;&lt;br /&gt;पावसात भिजून आणि ओल्या मातीत खोपे करताना&lt;br /&gt;दगडधोंडे उचकताना अन् काट्याफुफाट्यात हिंडताना&lt;br /&gt;कळलंच नाही की तो आहे आणि हळूच कानी म्हणतो आहे&lt;br /&gt;"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;नवी नव्हाळी फुटताना, सगळं जग फुलताना&lt;br /&gt;नवी शिखरे चढताना, सागर पालथे घालताना&lt;br /&gt;छातीने पर्वत फोडताना अन् लाथेने पाणी काढताना&lt;br /&gt;दुर्लक्ष केलं उद्दामपणे जरी कळलं तो म्हणतोच आहे&lt;br /&gt;"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;नात्यांचे दोर काचताना अन् मैत्रीच्या काचा तडकताना&lt;br /&gt;जन्माचा हिशेब ठेवताना अन् जमलेल्या कवड्या मोजताना&lt;br /&gt;विषारी डंख झेलताना आणि हिरीरीने दात रोवताना&lt;br /&gt;चुकवली नजर अन् ऐकलं गुमान काय तो म्हणतो आहे&lt;br /&gt;"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;मोतीबिंदू आता साचताना अन् लख्ख सगळं दिसताना&lt;br /&gt;आयुष्याचे तांडव पाहताना अन् सयींचा छळ सोसताना&lt;br /&gt;एकटाच ओझे वाहताना अन् पैलतीराकडे पाहताना&lt;br /&gt;वाट पाहतोय, कधी तो जवळ येऊन म्हणतो आहे&lt;br /&gt;"भिऊ नकोस ... मी तुझ्या पाठीशी आहे."&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-2959778410327763189?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/2959778410327763189/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/04/blog-post_1125.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/2959778410327763189'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/2959778410327763189'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/04/blog-post_1125.html' title='भिऊ नकोस ...'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-9042385657241617355</id><published>2011-04-19T06:46:00.000-07:00</published><updated>2011-04-19T06:49:41.498-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>किल्ली</title><content type='html'>प्रत्येक कुलपाला एक किल्ली असते&lt;br /&gt;कधी बरोबर तर कधी दुरावलेली असते&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुलूप कधी सुबक ठेंगणं असतं&lt;br /&gt;तर कधी कुरूप बेंगणं असतं&lt;br /&gt;कधी कधी अवघड नाठाळ असतं&lt;br /&gt;तर कधी प्रेमळ ओढाळ असतं&lt;br /&gt;कसंही असलं तरी किल्ली बनलेली असते&lt;br /&gt;त्यांची गाठ म्हणे वरतीच मारलेली असते&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुलपावर सगळ्या घराचा राखणभार असतो&lt;br /&gt;पण घरात राहायला किल्लीचाच आधार असतो&lt;br /&gt;कुलूप घरीच राहून घर राखत बसतं&lt;br /&gt;तेव्हा किल्लीला बाहेर उंडारायचं असतं&lt;br /&gt;कितीही भटकली किल्ली तरी शेवटी फिरून घरीच येते&lt;br /&gt;दुसर्‍या दारांवरून गेली तरी आपल्याच कुलपाला लागते&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुलूप किल्लीच्या नात्याची हीच एक गंमत असते&lt;br /&gt;दाराला कुलूप लावले तरच किल्लीला किंमत असते&lt;br /&gt;प्रेमानं दोघं राहिली तर वंगणाची निश्चिंती असते&lt;br /&gt;भांडलीतंडली तर मात्र गंजण्याची निश्चिती असते&lt;br /&gt;म्हणूनच म्हणतो प्रत्येक कुलपाला एक किल्ली असते&lt;br /&gt;तिने कुलपाला आणि कुलपाने तिला जपलेली असते&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-9042385657241617355?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/9042385657241617355/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/04/blog-post_8121.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/9042385657241617355'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/9042385657241617355'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/04/blog-post_8121.html' title='किल्ली'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-8241290473942997989</id><published>2011-04-19T06:38:00.000-07:00</published><updated>2011-04-19T06:49:41.498-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>मोहोर</title><content type='html'>नियतीच्या सहस्त्र भुजांत अजस्त्र विक्राळ जोर आहे&lt;br /&gt;विधीलिखितावर अटळपणाची उमटलेली मोहोर आहे&lt;br /&gt;&lt;br /&gt;टेबलाशी खुर्चीत एकेक खिडकीशी बसला चोर आहे&lt;br /&gt;उपोषणांच्या वांझपणावर उमटलेली मोहोर आहे&lt;br /&gt;&lt;br /&gt;आग्रा कधी अमृतसर कधी मोहाली कधी लाहोर आहे&lt;br /&gt;मूक थडग्यांवर अहिंसेची उमटलेली मोहोर आहे&lt;br /&gt;&lt;br /&gt;जन्मानंतर तोडली नाळ जणू कापलेला दोर आहे&lt;br /&gt;अंतापर्यंतच्या भटकण्यावर उमटलेली मोहोर आहे&lt;br /&gt;&lt;br /&gt;भरल्या पोटी गातो गाणे निरंजन भाव विभोर आहे&lt;br /&gt;झगड्यावरती रोज लाखोंच्या उमटलेली मोहोर आहे&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-8241290473942997989?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/8241290473942997989/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/04/blog-post_19.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/8241290473942997989'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/8241290473942997989'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/04/blog-post_19.html' title='मोहोर'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-6129427908589640611</id><published>2011-04-19T06:32:00.000-07:00</published><updated>2011-04-19T06:49:41.498-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>पाऊस माझा</title><content type='html'>आजीचा जणू देवघरात&lt;br /&gt;मंत्रपाठसे मंद सुरात&lt;br /&gt;ईशस्तवने मंगल गात&lt;br /&gt;कधी जागवी सुप्रभात&lt;br /&gt;पाऊस माझा पाऊस माझा ||१||&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रानावनात घुमवी पावा&lt;br /&gt;हवेत धुंद गंध शिडकावा&lt;br /&gt;लपाछपीचा डाव नवा&lt;br /&gt;भटकंतीला साथी हवा&lt;br /&gt;पाऊस माझा पाऊस माझा ||२||&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तृषार्त तप्त रसा दुपारी&lt;br /&gt;जल वर्षता होय गोजिरी&lt;br /&gt;इंद्रधनूचा वेल अंबरी&lt;br /&gt;फुलवी खुलवी प्रीत अंतरी&lt;br /&gt;पाऊस माझा पाऊस माझा ||३||&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधी तरी अन् कातरवेळी&lt;br /&gt;डोह मनाचा निर्मम घुसळी&lt;br /&gt;गतकाळाच्या आठवणींनी&lt;br /&gt;भरतो डोळा माझ्या पाणी&lt;br /&gt;पाऊस माझा पाऊस माझा ||४||&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रभू चरणी एक मागणी&lt;br /&gt;सरणावरती देता अग्नी&lt;br /&gt;धूर निरंजन मेघ व्हावा&lt;br /&gt;आणि भूवर या बरसावा&lt;br /&gt;पाऊस माझा पाऊस माझा ||५||&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-6129427908589640611?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/6129427908589640611/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/04/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/6129427908589640611'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/6129427908589640611'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2011/04/blog-post.html' title='पाऊस माझा'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-3552989131648293448</id><published>2010-12-30T19:09:00.000-08:00</published><updated>2010-12-30T19:10:56.492-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्तक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>कागद</title><content type='html'>आज लवकरच ती कामाला लागली. पोराला काखोटीला मारून आणि नायलॉनचं मळकट पोतं घेऊन ती नेहमीप्रमाणे त्या रस्त्यावर आली तेव्हा सगळीकडे कागदांचा खच पडला होता. काल संध्याकाळी तिथून गेलेल्या भव्य मोर्चात उधळलेल्या हँडबिलांनी इतरवेळी सुबक नेटका वाटणारा तो रस्ता आता मातीत खेळून आलेल्या वांड पोरासारखा दिसत होता. पोराला रोजच्यासारखं नंदूच्या टपरीच्या वळचणीला ठेवून ती भराभरा कागद गोळा करायला लागली. नेहमीपेक्षा निम्म्या वेळातच तिचं पोतं कागदांनी गच्च भरून गेलं आणि रस्ताही बऱ्यापैकी मूळ स्वरुपात आला. सगळे कागद आता संपले होते तरी ती शोधकपणे थोडा वेळ इकडे तिकडे पाहत हिंडत राहिली. बऱ्याच ठिकाणी मोर्चातल्या लोकांच्या सुटलेल्या धडक्या तुटक्या चपला आणि कंगवे वगैरे सटर फटर वस्तू पडलेल्या होत्या. ती उगिचच त्या वस्तुना पायाने एका बाजूला लोटत राहिली आणि मिळतील तेवढे तुरळक कागद गोळा करत राहिली. तास-दीड तासाने हळू हळू रस्ता जागू लागला आणि वाहनांची वर्दळ थोडी थोडी सुरू झाली. मग ती जायला वळली आणि तेवढ्यात धुळीत पडलेलं कोणाचं तरी पैशांचं पाकीट तिला दिसलं. तिचे डोळे लकाकले. आजचा दिवस तिच्यासाठी फारच चांगला निघाला होता. कोणी पाहत नाही असं पाहून तिने झटकन पाकीट उचललं आणि मग ती मागे वळून न पाहता पोतं घेऊन नंदूच्या टपरीकडे आली.&lt;br /&gt;पोतं भिंतीला टेकवून ठेवलं आणि भिंतीकडेच तोंड करून तिने गुपचूप पदराआड पाकीट उघडलं. आत दहाच्या चार पाच आणि पन्नासची एक नोट होती. एवढे पैसे पाहून तर ती घबाड मिळाल्यासारखी हरखून गेली. पटकन ते पैसे तिने कनवटीला लावले आणि पाकीट दिलं पोराला खेळायला. तिने समाधानाने एक खोलवर श्वास घेतला. रोज तिला त्रास देणारा गरम बटाटेवड्याचा आणि मिसळीचा वास आज तिने आनंदाने छाती भरून घेतला. कित्येक दिवसांनी तिला आज नुस्त्या वासावर समाधान न मानता प्रत्यक्ष चव चाखायला मिळणार होती आणि तीही पोटभर खाऊन.&lt;br /&gt;ती टपरीजवळ गेली आणि पाच-सहा रुपये खर्चून तिने गरमागरम वडे, पाव आणि मिसळीचा झणझणीत रस्सा घेतला. तिथेच पडलेला कालचा शिळा पेपर तिने उचलला आणि पुनः पोत्याजवळ येऊन बसली. थोडी भिंतीला आणि थोडी कागदाच्या पोत्याला असं थाटात रेलून बसून तिने पेपर खाली अंथरला आणि त्यावर खाद्यपदार्थ ठेवले. तिने मिसळ पावाचा एक घास घेतला आणि डोळे मिटून त्या चवीचा तवंग सर्वांगावर पसरताना पाहत राहिली. तिने डोळे उघडून पाहिलं तेव्हा पोरगं पाकीटात सापडलेल्या लॉटरीच्या तिकीटाशी खेळत होतं. शंभर रुपयांच्या नोटेपेक्षाही मोठं आणि रंगीबेरंगी तिकीट निरखून पाहण्यात ते गुंगून गेलं होतं. तिने त्याला हाक मारली तेव्हा त्याची तंद्री भंगली आणि आई काहीतरी खायला बोलावतेय हे पाहून हातातलं तिकीट टाकून ते आईकडे पळालं. त्याला तिने एक घास भरवला आणि दोघं एकमेकांकडे पाहून समाधानाने हसली. अंथरलेल्या पेपरमध्ये नुकत्याच टाकून दिलेल्या तिकीटाचा नंबर छापून आला आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-3552989131648293448?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/3552989131648293448/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/12/blog-post_30.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/3552989131648293448'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/3552989131648293448'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/12/blog-post_30.html' title='कागद'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-1267704999872807332</id><published>2010-12-26T18:19:00.001-08:00</published><updated>2010-12-26T18:21:25.159-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>अ ख्रिसमस मिरॅकल</title><content type='html'>सुजीत, मनिषा आणि अर्णवला बाय करून अनंतराव घरात आले. बाहेरच्या बर्फाळ हवेतून घराच्या हीटर लावून उबदार ठेवलेल्या पोटात आल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. किचनमध्ये जाऊन त्यांनी हॉट चॉकोलेट ओतून घेतले आणि पुढच्या खोलीत येऊन गुबगुबीत सोफ्यावर अलगद बसले. दोन दिवस एवढ्या मोठ्या बंगल्यात आता एकट्यानेच राहायचं या विचाराने त्यांच्या मनावर गरम दुधावर साय जमा होते तसा एक उदासवाणा तवंग जमा झाला. त्यांना वत्सलाबाईंची आठवण झाली. तशी ती इतरवेळीही दिवसातून पन्नासवेळा होतच असे. वत्सलाबाई जाऊन आता वर्ष होत आलं असलं तरी इकडे आल्यापासून त्यांची आठवण खूपच यायला लागली होती. भारतात असताना वत्सलाबाई नसल्याचं इतकं वाईट वाटत होतं की नाही हे त्यांनी आठवायचा प्रयत्न केला पण त्यांना नक्की ठरवता आले नाही. त्यांना भारतातल्या आपल्या घराची तीव्रतेने आठवण झाली आणि पोटातून आतून कोणीतरी चिमटा काढल्यासारखं पिळवटलं गेलं. "उणीपुरी तीस वर्षं काढली असतील त्या घरात. मनिषाचं बालपणही त्याच घरात गेलं. तिला येत असेल का त्या घराची आठवण? वाटत तर नाही. इतकी मस्त रमली आहे या देशात. आपण मात्र सहा महिन्यात कंटाळलो. सकाळी सगळी आपापल्या कामाला गेली की दिवस खायला उठतो. वाचून वाचून तरी किती वाचणार? ना कोणी मित्र ना कोणी सोबती. संध्याकाळी फिरायला जाऊन गप्पा मारत बसावं असंही कोणी नाही. सकाळ संध्याकाळ आपलं घर, नाहीतर लायब्ररी किंवा मग एकट्यानेच फिरणे. शनिवार रविवार घर भरलेले असते खरे पण मनिषा-सुजीत-अर्णव त्यांच्या त्यांच्या व्यापांमध्ये मग्न असतात, मुद्दामहून कोण येऊन बोलत बसणार? वत्सला असती तर थोडी सोबत तरी झाली असती. दोघं एकमेकाना धरून राहिलो असतो. ती गेल्यावरही तिकडे एकटा रहिलो असतो खरं म्हणजे पण पोरीने ऐकलं नाही. अजून हातपाय धडधाकट आहेत तरी किती काळजी.आता असं एकट्याचं जिणं आलं नशीबी जावयाच्या दारात. तसा तो चांगला आहे पण आपण तरी किती लुडबूड करणार? सगळीकडे आपल्याला घेऊन जाणं कसं शक्य आहे? म्हणूनच म्हटलं या वेळी तुम्ही तिघेच जा."मनातल्या विचारांपासून सुटका म्हणून अनंतरावांनी उगाचच टीव्ही लावला आणि हॉट चॉकोलेट संपेपर्यंत निरर्थकपणे त्याच्याकडे पाहत बसले. मग टीव्ही बंद केला आणि रिकामा कप किचन सिंकमध्ये विसळून पुन्हा बाहेरच्या खोलीत आले. पुन्हा सोफ्यासमोर उभे राहून आता पुढे काय करावे या विचारात आपल्या थोड्याशा सुरकुतलेल्या गालावरचे दाढीचे खुंट उगाचच खाजवत उभे राहिले. आत्ता कुठे दहा वाजत आलेत आणि आख्खा दिवस समोर आ वासून पडला आहे. त्यात परत हिवाळा असल्याने चारपाच वाजताच अंधार पडणार. या कडाक्याच्या थंडीत बाहेर जायची इच्छासुद्धा होत नाही. लायब्ररीत जावे की घरीच वाचत बसावे यावर काही वेळ विचार केल्यावर त्यांनी शेवटी घरीच बसायचे ठरवले. मग उगीचच आळोखेपिळोखे देत ते स्टडीमध्ये आले आणि बुकशेल्फ समोर उभे राहून वाचायला एखादे छानसे पुस्तक शोधू लागले. बरीचशी पुस्तके एक-दोनदा वाचून झाली होती. कोणतेही पुस्तक पाहिले की त्यांना त्यात कायकाय आहे ते आठवायचे आणि मग नको ते पुन्हा वाचायला असा विचार करून पुढे जायचे असा खेळ बराच वेळ झाल्यावर त्यांनी एक त्यातल्या त्यात हलकेफुलके असे पुस्तक निवडले आणि ते घेऊन खोलीत जाऊन बेडवर पडून वाचू लागले. एका हातात पुस्तक धरून दुसर्‍या हाताने दुलई गळ्यापर्यंत ओढून घेत ते लगेचच पुस्तक वाचण्यात गुंगुन गेले.नेहमीच्या सवयीने शेजारचे रामभाऊ त्यांच्या खांद्याला सारखा स्पर्श करीत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाबद्दल आणि भारताच्या बोटचेपेपणाबद्दल तावातावाने बोलत होते आणि अनंतराव नेहमीप्रमाणे मान डोलावून हो हो म्हणत होते; तितक्यात वरून वत्सलाबाईंची हाक ऐकू आली. अनंतरावांनी वर पाहिले तर वत्सलाबाई गॅलरीतून वाकून काहीतरी ओरडून सांगत होत्या. बहुतेक कोपर्‍यावरच्या दुकानातून काहीतरी आणायला सांगत असाव्यात. त्यांच्या हातात पिशवी दिसत होती. त्यांनी ती पिशवी खाली फेकली. पिशवी खाली पडून खराब होऊ नये म्हणून अनंतराव ताडकन उठले आणि पिशवी झेलायला तरातरा जाऊ लागले. अचानक त्यांचा पाय कशात तरी अडकला आणि फटकन त्यांच्या तोंडावर काहीतरी पडले.... दचकून अनंतरावांनी डोळे उघडले, तोंडावर पडलेले पुस्तक बाजूला करत त्यांनी आपण नक्की कुठे आहोत त्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. कुठे आहोत ते कळल्यावर पुन्हा ते एकटेपणाचे आणि निराशेचे काळे पांघरूण त्यांच्या मनावर ओढले गेले आणि स्वप्नात नुकतेच पाहिलेले मस्त प्रखर ऊन, आपले घर आणि वत्सलाबाईंना आठवत ते चेहर्‍यावर बावळट भाव घेऊन पडून राहिले. थोडावेळ तसेच पडून राहिल्यावर त्यांनी घड्याळात पाहिले. फक्त एक-दीड तासच गेला होता. या वेगाने जर वेळ जात असेल तर दोन दिवसात वेड लागेल असे त्यांना वाटले. सुजीत-मनिषाचा आग्रह मोडून उगाचच घरी एकटा राहिलो असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या प्रायव्हसीची, एन्जॉयमेन्टची काळजी करून फुकाचा मोठेपणा घेतल्याबद्दल त्यांना आता थोडासा पश्चात्ताप होऊ लागला. गेलो असतो बाहेर त्यांच्याबरोबर तर वेळ तरी मजेत गेला असता असे त्यांना वाटले. दोन-तीन मिनिटे त्याच वाक्यावर विचार करत बसल्यावर त्यांच्या डोक्यात काही तरी चमकले. बाहेर जायचं तर सुजीत-मनिषाबरोबरच जायला पाहिजे असं थोडीच आहे? आपलं आपणही जाऊ शकतोच की.शिवाय ख्रिसमस म्हणून दुकानं इतकी गजबजली आहेत, काय हरकत आहे एक चक्कर मारून यायला? एका माफक धाडसाच्या थ्रीलींग कल्पनेने त्यांचा चेहरा एकदम उजळला. हातापायात एकदम जोर आल्यासारखं त्यांना वाटलं आणि ते ताडकन उठले. उत्तेजितपणे हातावर हात चोळत बाथरूममध्ये गेले.अर्ध्या तासातच मस्तपैकी गुळगुळीत दाढी करून, गरम पाण्याने आंघोळ करून, पोलो टी शर्ट, चिनोज, पायात स्पोर्ट शूज,अंगात नुकतेच मनिषाने घेतलेले जर्कीन आणि डोक्यावर काळी कानटोपी घालून ते पुढच्या खोलीत सोफ्यावर बसलेले होते. उत्साहाने आणि उत्तेजनेने त्यांचा एक पाय तडतड उडत होता आणि ते लॅपटॉपवर शहरात जाण्याचे आणि येण्याचे बस रूट्स वगैरे शोधण्यात मग्न झाले होते. सगळी माहिती काढून झाल्यावर, पाकीटात पुरेसे पैसे आहेत याची खात्री झाल्यावर आणि मनिषाने दिलेल्या घराबाहेर जातानाच्या सूचनांची उजळणी करून झाल्यावर ते अखेर बाहेर पडले. बाहेर कडाक्याची थंडी असूनही बर्फ मात्र अजून पडले नव्हते. दोन्ही हात खिशात घालून अनंतराव बसस्टॉपकडे चालू लागले. उपनगरात फिरण्याची त्यांना चांगलीच सवय झाली होती पण आज पहिल्यांदाच ते एकट्याने पन्नास मैलांवरच्या मुख्य शहरात जात होते. बसस्टॉपवर जाऊन खिशातून कागद काढून बसस्टॉपच्या नंबरची खात्री करेपर्यंत बस आलीसुद्धा. काहीही विचार करायचा अवसर न मिळता काही क्षणातच अनंतराव बसच्या दारात उभे होते. पाकीटातून चिल्लर काढून तिकीटाच्या खोक्यात टाकताना आपल्या स्वभावाच्या विपरीत, उगाचच ते ड्रायव्हरकडे पाहून प्रसन्नपणे हसले. ड्रायव्हरनेदेखील हसून उगाचच "काय कसं काय?" वगैरे विचारून आपुलकी दाखवली. तोंडावर ते हसू तसंच ठेवत अनंतराव इतर प्रवाशांकडे बघत बघत एका सीटवर जाऊन बसले आणि खिडकीतून बाहेर एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने पाहू लागले. बस मार्गस्थ झाल्यावर आजूबाजूला दिसणारी मनिषाच्या घरासारखी घरे, रस्ते, झाडे आणि नंतर हळू हळू दिसू लागलेल्या उंच इमारती पाहत पाहत पाऊण-एक तास निघून गेला. शहरातल्या त्या भव्य चौकात बस आली तेव्हा ते लगबगीने उतरले. सगळीकडे माणसांची लगबगीने ये जा चालू होती. रस्ते वाहनांनी भरून गेले होते आणि हवेत गारठा असूनही चांगले लख्ख ऊन पडले होते. अनंतरावांनी एकदा सगळा चौक न्याहाळला. लखलखणार्‍या काचेरी इमारती, मोठे स्वच्छ रस्ते आणि चकाकणार्‍या गाड्या. सगळं निरखून पाहून मग त्यांनी आपला मोर्चा चौकातल्या एका बाजूला असलेल्या मॉलकडे वळवला. पाच-सहा मजली उंच आणि भव्य इमारतीत तो मॉल होता आणि त्या इमारतीवर चहू बाजूंनी दिव्यांच्या माळा सोडलेल्या होत्या. हे रात्री भलतंच सुंदर दिसत असेल असा विचार करत अनंतराव त्या मॉलमध्ये प्रवेशले. बाहेरच्या थंड हवे पेक्षा आत बरेच उबदार होते. दारातच मध्यभागी ठेवलेला मोट्ठा ख्रिसमस ट्री, सगळीकडे केलेली लाल-पिवळ्या रंगातले तारे, झिरमिळ्यांची सजावट, शुभेच्छांचे फलक, सांतासारख्या टोप्या घातलेल्या सुंदर कर्मचारी मुली, मुलांच्या सेक्शनमधला सांताक्लॉज आणि अगणित वस्तूंनी ठासून भरलेला तो मॉल पाहताना ते गुंगुन गेले. खरं तर मनिषा-सुजीतने त्यांना एकदा सगळं शहर फिरवून आणलं होतं पण एकट्याने फिरताना त्यांना ते सगळं जास्तच सुंदर आणि आकर्षक वाटत होतं. मॉलमध्ये फिरत खेळणी, कपडे, खाद्यपदार्थ आणि इतर लहानमोठ्या वस्तू पाहत पाहत दोन-तीन तास कसे गेले ते त्यांना कळालेच नाही. पोटात आता भूक लागली होती पण मॉलमधल्या फास्टफूड जॉईंटमध्ये जाऊन खाणे त्यांना नको वाटले. आता घरीच जाऊन खावे असा विचार करून ते तळमजल्याकडे जाणार्‍या लिफ्टमध्ये घुसले. दुसर्‍या मजल्यावर लिफ्ट थांबली आणि एक डब्बल हाडाची, त्यांच्याएवढीच उंचीची, पन्नाशीची बाई ट्रॉली ढकलत लिफ्टमध्ये शिरली. अनंतरावांकडे पाहून तिने स्मितहास्य केले आणि वळून तळघरात असलेल्या वाहनतळाचे बटन दाबण्याचा प्रयत्न केला पण ट्रॉलीवरून तिला ते जमले नाही. ते पाहून अनंतरावांनी पटकन पुढे होऊन बटन दाबून दिले. तिने पुन्हा एकदा हसून त्यांच्या कडे पाहिले आणि आपले सोनेरी केस मागे उडवत,"थँक यू" म्हणाली. तिच्या हसर्‍या निळ्या डोळ्यांकडे पाहत अनंतरावही हसले आणि कसेबसे "वेलकम" म्हणाले. ती मोबाईल मध्ये काहीतरी पाहू लागली आणि अनंतराव डोळ्यांच्या कोपर्‍यातून तिचे निरीक्षण करू लागले. पांढरे स्वेटर आणि गुलाबी स्कर्ट घातलेली ती स्त्री बरीच खरेदी करून घरी निघालेली दिसत होती. तळमजल्यावर लिफ्ट थांबली तरी अनंतरावांना कळाले नाही. दार उघडून लागले आणि लिफ्ट तळघराकडे गेली. लिफ्टचे दार उघडल्यावर अनंतराव भानावर आले आणि त्यांना चूक कळली. ती स्त्री बाहेर जाण्यासाठी ट्रॉली ढकलू लागली पण ट्रॉली ढिम्म हलेना. अनंतरावांनी पुन्हा तत्परतेनं दरवाजा उघडण्याचे बटन दाबून धरले. थोडी झटापट करूनही ट्रॉली हलत नाही हे पाहून तिने त्यांच्याकडे पाहिले आणि इंग्लिशमध्ये उद्गारली,"काय झालंय काही कळत नाहीय"."थांबा, मी बाहेरून ओढतो", अनंतराव म्हणाले आणि लिफ्टच्या दारात उभे राहून त्यांनी ट्रॉली ओढायला सुरुवात केली. बरीच ताकद लावल्यावर ती ट्रॉली सरकत सरकत लिफ्टच्या बाहेर आली. तिची दोन चाके अडकून बसल्याने फिरत नव्हती."अचानक कशी काय बिघडली कोण जाणे?", ती स्त्री म्हणाली."चाकं अडकलेली दिसताहेत"."तू कृपया मला गाडीपर्यंत सामान न्यायला मदत करू शकशील का? ""हो हो का नाही? द्या मी घेतो काही पिशव्या", असं म्हणून अनंतरावांनी तिने दिलेल्या जड पिशव्या आपल्या हातात घेतल्या आणि तिच्याबरोबर तिच्या गाडीकडे चालू लागल्या."मी मार्था. मार्था वॉटसन", ती म्हणाली."अच्छा. मी अनंत देशपांडे.""भारतातून आलास का?""होय. सहा महिने झाले. इथे मुलीकडे राहतोय.""नशिबवान आहेस.", ती म्हणाली.गाडीपर्यंत आल्यावर तिने गाडीची ट्रंक उघडली आणि त्यात तिच्याकडच्या आणि अनंतरावांकडच्या पिशव्या ठेवल्या."धन्यवाद. तुझी खूपच मदत झाली. तुझी गाडी आहे का की मी तुला कुठे सोडू ?", तिने विचारले."नाही नाही. मी पार त्या तिकडे राहतो", अनंतरावांनी उपनगराचे नाव सांगितले."अरे! मी ही तिकडेच राहते. तिथे नक्की कुठे?"अनंतरावांनी मनिषाने लिहून दिलेला पोस्टल अ‍ॅड्रेस पाठ म्हणून दाखवला. मार्थाच्या डोळ्यात मिस्कील हसू उमटले."अरे वा! काय हा योगायोग! तिथून फक्त दोन ब्लॉक अंतरावर राहते मी. आपण शेजारी आहोत म्हणायचे", ती मनमोकळेपणे हसून म्हणाली, "चल मी सोडते तुला घरी."अनंतराव थोडे संकोचले पण बसची वाट पाहावी लागणार नाही आणि पैसेही वाचतील या विचाराने सुखावलेही. त्या भल्या मोठ्या गाडीत चढून ते मार्थाशेजारी बसले. सफाईदारपणे गाडी बाहेर काढून मार्थाने वेगात रस्त्यावर आणली आणि घराकडे दामटली.गाडीत दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. अनंतरावांनी आपली कहाणी इत्यंभूत सांगितली,"अबक कंपनीत नोकरीला होतो. दोन वर्षांपुर्वी रिटायर झालो. गेल्या वर्षी बायको गेली, सहा महिन्यांपुर्वी कायमचा मुलीकडे आलो" वगैरे.मार्थानेही आपली कहाणी सांगितली, "एकुलता एक मुलगा आणि त्याची मी घटस्फोटित आई. मुलगा सैन्यात. दोन वर्षांपुर्वी कुठल्याशा देशातल्या मोहिमेत गेलेला. आता मी एकटी. एका लोकल फर्ममध्ये काम करून जगतेय.", वगैरे.मग आवडीनिवडींवर बोलणं झालं. आपण कसे एकटे आहोत, कंटाळलो आहोत याचा पाढा अनंतरावांनी वाचला. त्यावर मार्थाने कम्युनिटीक्लब जॉईन करण्याचे वगैरे सुचवले. एकंदरीत बरीच बडबड करत तो पाऊण-एक तासाचा प्रवास संपला. घरासमोर गाडी थांबली आणि "अच्छा, भेटू पुन्हा", म्हणून अनंतरावांनी दार उघडले. मार्थाने एक-दोन क्षण विचार केला आणि एकदम म्हणाली, "तुला माझ्या घरी यायला आवडेल? नाहीतरी तू एकटाच आहेस आत्ता. काहीतरी पिऊया, गप्पा मारूया."अनंतरावांनी एकदा घराकडे पाहिले आणि जरा विचार केला. त्या सुनसान घरात जायची त्यांची इच्छा झाली नाही. काही न बोलता ते पुन्हा गाडीत चढले आणि दार लावून घेतले. पाच मिनीटांनी ते मार्थाच्या घरात प्रवेशले. घर फार मोठं नव्हतं पण टापटिपीने ठेवलेलं होतं. कोपर्‍यात एक न सजवलेला ख्रिसमस ट्री होता आणि शेजारी टेबलावर काही फोटो. मार्थाचे आणि तिच्या मुलाचे."बीअर घेणार?", मार्थाने विचारले.अनंतराव एकदम गडबडले,"न...नाही,नको""मग काय घेशील? अजून मला एगनॉग करायचाय, नाही तर तोच दिला असता. तू वाईन घेशील?"आताही नाही म्हणणे म्हणजे फारच भोमटपणा वाटेल असे अनंतरावांना वाटले आणि त्यांनी मूकपणे मान हलवूनच होकार दिला. बाहेर आता अंधार दाटू लागला होता. मार्थाने दिवे लावले आणि वाईनचे ग्लास आणि खायला सँडविचेस घेऊन आली.वाईनचे एक-दोन घुटके उपाशीपोटी घेताच अनंतरावांना एकदम तरल वाटू लागलं. ते एकदम सैलावले. इतके की सँडविचमध्ये मांस वगैरे आहे की नाही याची चौकशी न करता बिनधास्त एक उचलून त्यांनी लचका तोडला. त्याची चवही त्यांना अप्रतिम वाटली. मग त्या दोघांच्या अशा काही गप्पा रंगल्या की बस. रात्रीचं जेवणही त्यांनी तिच्याकडेच घेतलं आणि मग त्यानंतरही तास-दोनतास गप्पा ठोकून शेवटी नाईलाजाने घरी जायला निघाले.मार्थाने त्यांना रस्ता समजावून सांगितला आणि दारापर्यंत सोडायला आली. काय बोलावे अनंतरावांना कळेना. खरं तर पुन्हा कधी भेटू या असं त्यांना विचारायचं होतं पण त्यांचा धीर होत नव्हता. नुसतेच स्मितहास्य करत त्यांनी तिच्याकडे पाहिले आणि निरोपादाखल मान हलवून ते जड पावलांनी निघाले. ती दारातच उभी होती. तीन-चार पावले टाकल्यावर आपसूकच त्यांनी पुन्हा वळून तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा हात हलवून जायला वळले."अनंत", मार्थाचा आवाज आला, "उद्या संध्याकाळी मी ट्री डेकोरेशन पार्टी ठेवली आहे. तुला यायला आवडेल?"एकदम आपल्याला खूप हसू फुटणार असे अनंतरावांना वाटले पण ते दाबत शांतपणे ते वळले आणि आवाज स्थिर ठेवत म्हणाले, "अर्थातच.मी नक्की येईन."दोघेही एकमेकांकडे पाहून हसली आणि अनंतराव वळून चालू लागले. घराघरांवर दिवे लुकलुकत होते आणि हळुवारपणे बर्फ पडायला सुरुवात झाली.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-1267704999872807332?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/1267704999872807332/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/12/blog-post_26.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/1267704999872807332'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/1267704999872807332'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/12/blog-post_26.html' title='अ ख्रिसमस मिरॅकल'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-7565264371707804626</id><published>2010-12-23T22:49:00.000-08:00</published><updated>2010-12-23T22:55:56.798-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभव'/><title type='text'>माझे छळवादी.</title><content type='html'>&lt;p&gt;ऑफिसमधली ऐन कामाची वेळ. मी अगदी कॉम्पुटरच्या  स्क्रीनमध्ये घुसून कामात एकाग्र झालेलो. बाकीचेही लोक कामात गर्क. अगदी पिनड्रॉप नाही तरी ऑफिसमध्ये बऱ्यापैकी शांतता. अशा या कर्मसमाधीत एकतान झालेलो असताना अचानक कानावर समाधीतून ओढून काढणारा आणि दुर्लक्ष न करता येण्याजोगा आवाज येतो "फुर्र फुर्र" किंवा "मच्याक मच्याक मच्याक..". मी डोळे बंद करतो, दात आवळतो आणि सर्वांगातून जाणारी संतापाची सणक कमी व्हायची वाट पाहतो. खोल श्वास घेउन डोकं थोडं शांत झाल्यावर मी वळून पाहतो. अपेक्षेप्रमाणे माझा एखादा कॉफी पिणारा किंवा सॅन्डविच खाणारा किंवा डब्यातला भात खाणारा  देशबांधवच त्या आवाजाचा स्त्रोत असतो. मी वळून पहिले म्हणजे काहीतरी गडबड आहे ही शंका त्याला यावी ही माझी अपेक्षा फोल ठरवत तो मला एका गोग्गोड स्माईल देतो. मी मलूलपणे हसून त्याने तोंड आणखी उघडून विश्वरूप दर्शन द्यायच्या आत पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागतो. त्यानंतर त्याचं खाणं-पिणं होईपर्यंत माझं लक्ष कामात लागत नाही आणि बहुतेकवेळा मी पाणी प्यायला म्हणून उठून जातो.&lt;/p&gt;&lt;br /&gt;     &lt;p&gt;कामाच्या दिवशी सकाळी साडेसातला मी ट्रेन पकडतो तेव्हा बरीच गर्दी असते पण त्यात माझे देशबांधव फारसे दिसत नाहीत. पण जर कधी उशीर झाला तर ट्रेनमध्ये देशबांधवांची संख्या बरीच दिसते. देशबांधव चेहरेपट्टीवरून तर ओळखू येतातच पण आणखी एक व्यवच्छेदक लक्षण आहे. ते म्हणजे पाठीवर अडकवलेली सॅक. व्यवस्थित फॉर्मल किंवा सेमीफॉर्मल कपडे घातल्यावरही सॅक पाठीला कशाला हवी हे मला कळत नाही. इतर लोक छानपैकी स्टायलिश ऑफिसबॅग्ज वापरत असताना आपण अगदी लुई व्हीटन नाही तरी एखादी साधी पण चांगली दिसणारी बॅग वापरावी असं का वाटत नाही कोण जाणे. असो ज्याची त्याची आवड. त्याचा त्रास नाही. त्रास संध्याकाळी होतो. संध्याकाळी घरी जाताना गर्दीच्या वेळी हे सॅकधारी बरेच दिसतात आणि सॅक पाठीवरून न काढता गर्दीत घुसतात आणि मग गर्दीत जसे जसे लोक चढतील उतरतील तसे तसे त्यांना जागा करून देताना इकडे तिकडे हलतात आणि आपल्या सॅकने मागे उभ्या असलेल्या माणसाच्या छातीला, पोटाला किंवा जमलंच तर तोंडालाही छानपैकी मसाज करतात. जेवणाचे डबे भरलेल्या या सॅक्सनी अशा बऱ्याच डब्यांचा वास अंगात जीरवलेला असतो आणि मग मागे उभ्या असलेल्या माणसाला तो 'सु'गंधी मसाज सहन करण्यावाचून पर्याय उरत नाही.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;हे झालं कामाच्या दिवशीचं. सुट्टीच्या दिवशी देशबांधव सहकुटुंब बाहेर पडतात आणि या कुटुंबांचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यांच्याबरोबर असलेली बाबागाडी आणि त्यात एक बाबा किंवा बाबी.&lt;br /&gt;परदेशात नोकरी करायला शक्यतो तरुण जोडपीच येतात पण तरुण असूनही मूलबाळ अजून न झालेल्यांचं प्रमाण दहात एक असावं. पंचवीस-सव्वीस वयाच्या जोडप्याला एक-दोन वर्षांचं एक आणि तीस-बत्तीस वयाच्या जोडप्याकडे ४-५ चं एक आणि १-२ चं एक असं साधारण चित्र असते. छान सुखी कुटुंबे. असं एखादं कुटुंब ट्रेनमध्ये शिरतं, त्यांच्याकडे असलेल्या बाळाकडे पाहून जागा करून दिली जाते. बाळाची आई आणि बाळ बसते तो पर्यंत ठीक पण ५०-६० वर्षांच्या व्यक्तींनी दिलेली जागा घेउन बाळाचा तिशी-पस्तीशीतला बापसुद्धा बसून घेतो. लांब उभं राहून मी आपला बघतो.&lt;/p&gt;&lt;br /&gt;                &lt;p&gt;चित्रपटाच्या तिकीटाची रांग असो की बसच्या तिकीटाची माझ्या मागे जर एखादा देशबांधव येउन उभा राहिला तर माझा थरकाप होतो. बऱ्याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसऱ्या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या. &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;तसा मी माणूसघाणा नाही आणि लोकांचं निरीक्षण करून त्यांना नावं ठेवणे मला आवडत नाही. पण कधीकधी काहीकाही गोष्टी अगदीच सहन होता नाहीत. विशेषत: आपले देशबांधव असं वागताना पाहून वाईट वाटते. आपण आपल्या संस्कृतीचे इतके गोडवे गातो मग हे साधे संस्कार का नसावेत लोकांवर?  दुसऱ्यांबद्दल जराही संवेदना नसावी?&lt;br /&gt;या असल्या वागण्याने एक समाज म्हणून, एक देश म्हणून आणि एक संस्कृती म्हणून आपण काय चित्र उभे करतो जगासमोर? हे आणि असलेच निष्फळ, निरर्थक आणि फालतू विचार मनात येउन मी आपला उगीच माझाच छळ करत बसतो.&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-7565264371707804626?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/7565264371707804626/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/12/blog-post_23.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/7565264371707804626'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/7565264371707804626'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/12/blog-post_23.html' title='माझे छळवादी.'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-7448158226061760556</id><published>2010-12-19T21:03:00.001-08:00</published><updated>2010-12-23T17:41:01.239-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्तक'/><title type='text'>पूल लाईफ</title><content type='html'>दमटलेल्या संध्याकाळी थंडगार पाण्यात डुंबायचं सुख काही औरच. संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणाऱ्या आणि निळ्या टाईल्समुळे निळ्याशार दिसणाऱ्या पाण्यात संथपणे फेऱ्या मारत असताना शरीर आणि मनाची एक मस्त तंद्री लागते. त्याच तंद्रीत काल पोहत असताना एक गमतीदार विचार मनात आला. दोन तासांच्या त्या पोहण्यात आणि आयुष्यात किती तरी साम्य आहे असं वाटलं. कितीही उकडत असलं तरी कपडे काढून थंडगार पाण्यात उतरताना थोडातरी त्रास होतोच. त्या जन्मवेदना. जन्मल्यावर लहान बाळ रडतं तसं पाण्याची सवय होईपर्यंत तोंड वाकडं करून थोडंसं हा हा हू हू केलं जातंच. मग जरा इकडे तिकडे पाहायचं. आपल्यासोबत पूलमध्ये कोण कोण आहे, कोण कसं आणि कुठून पोहत आहे ते पाहून आपल्याला कुठे आणि कसं पोहायचं ते ठरवायचं आणि मग पोहायला सुरुवात करायची. तरूणपणी जसं चुकत माकत धडपडत शिकतो तसंच आखडलेले स्नायू सैल होईपर्यंत जरा लय चुकायला होते, मध्येच नाका-तोंडात पाणी जातं, मध्येच थांबून थोडा अंदाज घेऊन मग पुन्हा सुरु करावं लागतं किंवा कधी कधी आधारही घ्यावा लागतो. कधी कधी उगाचच आपल्या बरोबर पोहणाऱ्या लोकांशी स्पर्धा केली जाते. कोणी आपल्याला मागे टाकून पुढे जात असेल तर उगाचच जोरात हातपाय मारले जातात. त्यात वेगतर वाढत नाही उगाच दमायला मात्र होतं.&lt;br /&gt;थोड्या वेळाने म्हणजे साधारण चाळीशीच्या आसपास पाण्याचा अंदाज येतो, कुठे कसा प्रवाह आहे ते कळायला लागतं, पाण्याची आणि आपली ओळख झाल्यासारखी वाटते आणि मग कमीत कमी प्रयत्नात आपण सहज पोहू लागतो, पोहण्याची एक मस्त मजा यायला लागते आणि अनंतकाळ असंच पोहत राहावं असं वाटू लागतं. आता पोहोण्याकडे लक्ष न देताही आपण वेगात जात असतो आणि तरीही आजूबाजूला पाहून कोवळे उन, आजूबाजूची झाडं, माणसं यांचं निरीक्षण करू शकतो. पण मग हळू हळू संध्याछाया दाटू लागतात. अंधार पडू लागतो आणि शरीरही दमायला लागतं.  पुन्हा पोहण्याची लय चुकू लागते आणि इकडे तिकडे पाहताना मध्येच नाका-तोंडात पाणी जाते. आपल्या आधी आणि बरोबर पूलमध्ये उतरलेले हळू हळू निघून जातात. तरीही हट्टाने आपण काही काळ पोहतच राहतो. पण थोड्यावेळाने अगदीच कंटाळा येतो. मगाशी सुखकारक वाटणारी तंद्री आता कंटाळवाणी वाटू लागते. उन्हं जाउन आता अंधार पडल्याने बाकीचं काही दिसतही नसतं. मग एका क्षणी आपण निर्णय घेतो आणि पूलच्या बाहेर येतो, पूलच्या जगातून निघून जातो.&lt;br /&gt;सो फार सो गुड. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्याचं प्रतिबिंब पूलमध्ये सहज मावतं. पण मग विचार येतो की पूल मध्ये पोहणं आयुष्यासारखं आहे हे म्हणणे जेवढे बरोबर आहे तेवढेच आयुष्यच पूल मध्ये पोहोण्यासारखं आहे हे म्हणणे बरोबर नाही का? पद्धतशीरपणे आखलेल्या चाकोऱ्यामधून, ठरलेल्या मार्गांनी, हवे ते आधार घेउन माझं पोहणं चालू असतं. त्यातच काही ठरलेल्या स्पर्धा आणि ठरलेले पाडाव गाठल्याचा ठरलेला आनंद आणि सुखाच्या ठराविक कल्पना. पोहण्याचे सगळे आधार आणि जमा केलेल्या वस्तू प्राणपणाने जपत पोहणं संपेपर्यंत जास्त खोल नसलेल्या पाण्यात येरझाऱ्या घालणे. खुल्या समुद्रात पोहणारे वेगळेच. कधी त्यांना मोती मिळतात तर कधी अकाली जलसमाधी पण जितके पोहतात, धुंदीत पोहतात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-7448158226061760556?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/7448158226061760556/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/12/blog-post_19.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/7448158226061760556'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/7448158226061760556'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/12/blog-post_19.html' title='पूल लाईफ'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-2318342451014605761</id><published>2010-12-18T00:38:00.000-08:00</published><updated>2010-12-23T17:41:01.239-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्तक'/><title type='text'>संचित</title><content type='html'>आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात ज्यांचा आपल्याला नंतर  खूप त्रास होतो. रुखरुख लागून राहते. बऱ्याचशा घटना आपोआप घडतात, बऱ्याच गोष्टी आपण चुकीच्या समजुतीने करतो, बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात, बऱ्याच गोष्टींचं महत्व वेळीच कळत नाही किंवा बऱ्याच गोष्टींचा आपण अट्टाहास करतो. या घटनांच्या तीव्रतेप्रमाणे त्या त्या प्रमाणात मनावर डागण्या पडत जातात. या डागण्या, हे चटके हेच आयुष्याचं संचित. या डागण्या कधीच नाहीश्या होत नाहीत, त्या कधी बऱ्याही होत नाहीत. त्या बऱ्या करण्यासाठी धडपडूही नये. त्या बऱ्या करायला म्हणून आपण काही करू गेलो तर जखम आणखी ताजी तर होतेच वर नव्या डागण्या मिळायचीही शक्यता असते.&lt;br /&gt;पुढे पुढे सरकत जाणारा काळ हेच त्यावर काय ते औषध. एक रीवाईंड न होउ शकणाऱ्या टेप प्रमाणे आयुष्य पुढे सरकत जाते, नवीन अनुभवांची नवीन गाणी वाजतात, नवे चरे, नव्या डागण्या पडतात. जुन्या जखमांवर काळ खपली टाकत जातो.  त्या खपल्या प्रयत्नपूर्वक विसरत, पुन्हा निघू न देण्याची काळजी घेत नव्या अनुभवांना सामोरे जाणे ज्याला जमले तो सुखी.&lt;br /&gt;हे शहाणपण ज्या क्षणी येतं त्या क्षणी कर्मयोग सुरु होतो. मग सुख-दु:खाचं काही नवल वाटत नाही आणि जे आहे जसं आहे तसं स्वीकार करायला आपण शिकतो.&lt;br /&gt;दुसऱ्या व्यक्तीकडून प्रेमभावनेची किंवा ठराविक वागणुकीची अपेक्षा हे दु:खाचं दुसरं मूळ. आधी अपेक्षा करायची आणि ती पूर्ण नाही झाली की होणारं अपेक्षाभंगाचं दु:ख मोठंच, पण मनुष्यस्वभाव इतका विचित्र असतो की एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा काहीच नसल्या तरी आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोचवायची धडपड चालूच असते. भले त्या व्यक्तीला त्या भावना आवडो न आवडो.  पण भावना व्यक्त न करताच दाबून टाकणे हा त्यावर उपाय आहे का?  नाही. आहेत त्या भावना व्यक्त करणे हे तर सजीवांचे मुख्य लक्षण आहे. भावना व्यक्त केल्याच पाहिजेत पण त्या भावनांना अनुकूल प्रतिक्रिया आली नाही तर ते सहन करण्याचे सामर्थ्य पाहिजे. किंबहुना अनुकूल प्रतिक्रिया येणार नाही हे गृहीत धरूनच आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करणे हे ही कुठल्या योगापेक्षा कमी नाही.  आपण आपल्या भावनांचा सन्मान राखावा. दुसरे आपल्या भावनांची किंमत त्यांच्या आकलनाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे करतच असतात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-2318342451014605761?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/2318342451014605761/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/12/blog-post_18.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/2318342451014605761'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/2318342451014605761'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/12/blog-post_18.html' title='संचित'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-3509190820788585465</id><published>2010-12-16T23:33:00.001-08:00</published><updated>2010-12-23T21:45:11.972-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्तक'/><title type='text'>अव्यक्त</title><content type='html'>&lt;span style="display:none;"&gt;&lt;br /&gt;आज तुझा वाढदिवस. तुला त्याचं काहीच न वाटणारा. पण कसा कोण जाणे माझ्या मनात रुतून बसलेला. तुझे स्वप्न न चुकता घेऊन येणारा.&lt;br /&gt;आज पुन्हा तुझ्या मिटलेल्या आठवणी उमलू लागतात. आज पुन्हा मी आपल्यात नसलेल्या नात्याचा विचार करतो. काय हवंय मला?&lt;br /&gt;वेड्या वयातल्या त्या नजरभेटीला तसा काही अर्थ तरी होता का? पाहिलं प्रेम म्हणण्याइतकं आपल्यात काही झालं तरी का? नाही. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचा सहवास धडपडून, कशाचीच पर्वा न करता मिळवायचा असतो हे सुद्धा मला माहिती नव्हतं. तरीही आपल्यातलं ते अव्यक्त खूप सुख देउन गेलं. सुख मिळालं पण तृप्ती? ती अजून नाही मिळाली. काही तरी अजून ठसठसतंय. काही तरी राहून गेलंय.&lt;br /&gt;कदाचित आपण जवळ आलो असतो तर आयुष्य वेगळं झालं असतं किंवा नसतंही. अतिपरिचयात अवज्ञा झाली असती किंवा नसतीही. त्याचा आता काहीच संबंध नाहीय. तू तुझ्या जगात सुखी आहेस आणि मी माझ्या जगात जगतोय. ही दोन जगे आता कधीच एकत्र होणार नाहीत आणि व्हायलाही नकोत.&lt;br /&gt;पण माझ्यात काही तरी खदखदतंय. एक रुखरुख राहून गेलीये. मी वेळीच भावना व्यक्त केल्या असत्या, हात पुढे केला असता तर? कशाला घाबरून मी कधी बोललोच नाही? कसला विचार करून मी माझ्याच मनाकडे दुर्लक्ष केलं? एकमेकांपासून दूर जाताना का मी ते सहज स्वीकारलं? का मला तेव्हा ते तितकसं महत्वाचं नाही वाटलं? तरीही का नंतर ते सगळं मनात साठून राहिलं?&lt;br /&gt;आज वीस वर्षांनी सगळेच संदर्भ बदललेत. आज मी बोललो, व्यक्त झालो तरी त्याला काहीच अर्थ नाहीय. आज मी बोलल्याने परिस्थितीत एका केसाचाही फरक होणार नाहीय.&lt;br /&gt;तरीही मला बोलायचंय. का माहितीये? कारण मला ते अव्यक्त एकदाच निरर्थकपणे, निरपेक्षपणे व्यक्त करायचंय. एका क्षणासाठी तुझ्या जगातून तू आणि माझ्या जगातून मी बाहेर पडून ती अनुभूती एकदाच जागावायचीय. पुन्हा एकदा एका क्षणासाठी का होईना तुझ्या काळ्याभोर डोळ्यांत अनुरक्तीची लाली पहाचीय आणि त्या क्षणी ते अव्यक्त संपवायचंय.&lt;br /&gt;नुसत्या आठवणींच्या सांगाड्यावर तगलेलं ते अव्यक्त संपलंच पाहिजे. त्या अव्यक्ताला अमरत्वाचा शाप नकोय. एक दिवस तो क्षण नक्की येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;In between two worlds so sparse&lt;br /&gt;Lies a distance, some rules and bars&lt;br /&gt;Only a wish can reach and cross&lt;br /&gt;Valley of silence and memory's carcass&lt;br /&gt;Eternal may be your glow and your happiness&lt;br /&gt;You be on top of the world like a princess&lt;br /&gt;One day, I will bring a message to confess&lt;br /&gt;Unsaid, unwanted and perfectly meaningless.......&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-3509190820788585465?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/3509190820788585465/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/12/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/3509190820788585465'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/3509190820788585465'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/12/blog-post.html' title='अव्यक्त'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-4940236758732765795</id><published>2010-11-23T20:11:00.000-08:00</published><updated>2010-12-23T17:42:36.113-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>रक्षण</title><content type='html'>डोळे मिटून मी आत डोकावतो&lt;br /&gt;तेव्हा मला एक वाघुळ दिसतं&lt;br /&gt;तोंड झाकलेल्या विहीरीमध्ये&lt;br /&gt;ते गरागरा फिरत असतं&lt;br /&gt;बाहेरच्या प्रकाशाला अंधार&lt;br /&gt;नि आतल्या अंधाराला प्रकाश समजतं&lt;br /&gt;गोंगाट असल्यावर काही नाही&lt;br /&gt;पण शांतता झिरपलीच तर भेलकांडतं....&lt;br /&gt;सकाळी जेव्हा मी उठतो&lt;br /&gt;मऊ बिछान्यातून दुखर्‍या अंगानं&lt;br /&gt;बाहेर सृष्टी सजत असते&lt;br /&gt;शब्दरहित पण नवनव्या ढंगानं&lt;br /&gt;गवतावर नि:शब्दपणे दवबिंदु ठिबकतात&lt;br /&gt;आणि मूकपणे कळ्या उमलतात&lt;br /&gt;तिकडे मी चक्क दुर्लक्ष करतो&lt;br /&gt;गाड्यांचा पोंगाट ऐकत राहतो....&lt;br /&gt;बसची वाट पाहताना, एका कोपर्‍यात&lt;br /&gt;मला एक मांजर दिसतं&lt;br /&gt;कोवळ्या उन्हात एक पंजा वर करून&lt;br /&gt; स्वतःचंच पोट चाटत असतं&lt;br /&gt;बस यायच्या थोडंसं आधी का कोण जाणे पण ते वळतं&lt;br /&gt;टाटा केल्या सारखा पंजा हवेत ठेवून&lt;br /&gt;बिलोरी डोळ्यांनी माझ्यात खोलवर पाहातं&lt;br /&gt;मी नजर टाळून मोबाईल काढतो&lt;br /&gt;उगाच चाळा म्हणून वेळ पाहतो&lt;br /&gt;कोणी मेल टाकलंय का पाहतो&lt;br /&gt;फेसबुकवर कोणी आहे का पाहतो&lt;br /&gt;तेवढ्यात मग घरघरत बस येते&lt;br /&gt;सगळी माणसांची टरफलं पोटात घेते......&lt;br /&gt;ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर बसून&lt;br /&gt;मी त्याचीच नक्कल करत असतो&lt;br /&gt;बंद काचेबाहेर तेव्हाही&lt;br /&gt;गुलमोहराचा उत्सव चालूच असतो&lt;br /&gt;मी तिकडे बघतही नाही&lt;br /&gt;यंत्रांमध्येच रमतो&lt;br /&gt;यंत्रंही मला आता जिवंत वाटतात&lt;br /&gt;कारण माझा जिवंतपणाही तसाच असतो.....&lt;br /&gt;संध्याकाळी झाडं पानं मिटून घेतात&lt;br /&gt;आणि पक्षी घरट्यात जाऊन निजतात&lt;br /&gt;तेव्हा मी टीव्ही पाहत बसतो&lt;br /&gt;ग्रीन कार पासून ग्रीन कारखान्यांपर्यंत&lt;br /&gt;आणि ग्रीन सिमेंट पासून ग्रीन टॉयलेट पेपरपर्यंत&lt;br /&gt;सगळ्या जाहिराती पाहत असतो&lt;br /&gt;वाघांना कसं वाचवताहेत त्याची डॉक्युमेंटरी&lt;br /&gt;शार्क्सना कसं वाचवताहेत त्यावर कॉमेंटरी&lt;br /&gt;समुद्रातली कासवं वाचवणार&lt;br /&gt;बर्फातली अस्वलं वाचवणार&lt;br /&gt;सुंदरबनातले वाघ वाचवणार&lt;br /&gt;आफ्रिकेतले सिह वाचवणार&lt;br /&gt;झाडं वाचवणार जंगल वाचवणार&lt;br /&gt;नद्या वाचवणार डोंगर वाचवणार&lt;br /&gt;कोणालाही सोडणार नाही&lt;br /&gt;सगळी पृथ्वीच वाचवणार&lt;br /&gt;असा छानपैकी गोंगाट होतो&lt;br /&gt;आणि मेंदू रिकामा होऊन जातो&lt;br /&gt;मनही अगदी बधीर होऊन जातं&lt;br /&gt;आतलं वाघुळ थकून जातं....&lt;br /&gt;मग मी झोपायला जातो&lt;br /&gt;जडावलेल्या डोळ्यांनी विचार करतो&lt;br /&gt;त्या दवबिंदूंना, त्या कळ्यांना&lt;br /&gt;त्या मांजराला, त्या झाडांना&lt;br /&gt;एवढंच एक साकडं घालतो&lt;br /&gt;"माझ्यासाठी एवढं करणार ना?&lt;br /&gt;सगळं संपण्याआधी तुम्ही मला वाचवणार ना?"&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-4940236758732765795?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/4940236758732765795/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/11/blog-post.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/4940236758732765795'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/4940236758732765795'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/11/blog-post.html' title='रक्षण'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-4177572681260184559</id><published>2010-07-30T09:39:00.000-07:00</published><updated>2010-12-23T17:41:15.856-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्तक'/><title type='text'>निसर्गदूत</title><content type='html'>सिंगापुरात पहिल्यांदा पाय ठेवला तेव्हा फार प्रभावित झालो होतो. म्हणजे एअरपोर्ट वगैरे पाहून सगळे होतात तसा तर झालोच होतो, पण बाहेर पडल्यावर टॅक्सीतून बाहेर दिसणारी हिरवाई पाहून जास्त प्रभावित झालो होतो. एअरपोर्टच्या समोर आणि एअरपोर्टला शहराशी जोडणार्‍या रस्त्यावर भरपूर झाडं दिसत होती. विशेष म्हणजे ती मुद्दाम तिथे लावलेली आहेत हे उघड असलं तरी त्या झाडांतलं वैविध्य लक्षणीय होतं, उगीच सरकारी काम म्हणून इथून तिथून सुबाभळीची झाडं नव्हती लावून दिलेली. त्या पहिल्या १०-१५ मिनिटांत या देशाबद्दल माझं मत एकदम चांगलं झालं. विकासाबरोबरच या लोकांनी निसर्गही छान जपलेला दिसतोय असं मला वाटलं. टॅक्सी जशी जशी पुढे शहरात जाऊ लागली तसा तसा मला या शहराचा आखीव-रेखीवपणा दिसू लागला आणि मग लक्षात आलं की जागोजागी दिसणारी हिरवाई, झाडं वगैरे सगळा या आखीव-रेखीवपणाचाच भाग आहे. एअरपोर्टवर जशी मुद्दाम तयार केलेली  वृक्षराजी आहे जवळजवळ तशीच सगळीकडेच आहे. नैसर्गिकपणे वाढलेली झाडं-जंगलं आता शिल्लकच नसावीत. सगळीकडे HDB च्या आणि खाजगी टोलेजंग इमारती आणि त्याच्या बाजूने लावलेली झाडं. मोकळ्या जागांमध्येसुद्धा खास निगा राखलेली हिरवळ दिसत होती.पुढे इथं राहायला लागल्यावर किती मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालं आहे आणि जवळजवळ सगळंच कसं कृत्रिम आहे ते कळत गेलं. मी ही हळूहळू त्याला सरावलो. कृत्रिमपणे का ठेवलेलं असेना, सिंगापूर नक्कीच पुण्यापेक्षा जास्त हिरवं आहे एवढं मात्र नक्की होतं. या आखीव-रेखीव जगात जगताना एक एक करत ३ वर्षं उलटून गेली. नाही म्हटलं तरी रोजचा तो बंदिस्त ट्रेनचा प्रवास, तेच थंड काचेरी ऑफिस, तेच ते झगमगणारे मॉल्स आणि तीच ती शहरी आयुष्याची यातायात याचा थोडाफार परिणाम होतोच. अधून मधून सुट्टीला भारत, फुकेत, बाली वगैरे ठिकाणी गेल्यावरच काय तो खुला निसर्ग अनुभवायला मिळणार. इतरवेळी एका कृत्रिम बेटावर राहिल्यासारखं राहायचं.  असंच यंत्रवत वर्षानुवर्षे चालंलं होतं पण त्या दिवशी मला तो दिसला आणि मला अतिशय आनंद झाला. त्या दिवशी म्हणजे एका शनिवारी  संध्याकाळी घरामागच्या नदीकाठच्या रस्त्याच्या कडेने जॉगिंग करायला गेलो होतो. नदीत आता वॉटरपार्क करणारेत म्हणून रस्त्याच्या कडेने सगळं पत्रे लावून झाकून टाकलेलं. पण थोडं पुढे गेल्यावर पत्रे संपतात आणि गच्च झाडांची गर्दी   लागते. मी नेहमीप्रमाणे तो तुकडा डोळ्यांत साठवून घेत  हळूहळू पुढे चाललो होतो तेव्हाच रस्त्याच्या कडेला मला तो दिसला. तांबूस तपकिरी रंगाचे केस असलेला एक ससा तिथे लुटुलुटु ओठ हलवत गवत खात होता.  मी थबकलो आणि त्याच्याकडे पाहत राहिलो. एका बाजूला थोड्या अंतरावर असणारं ते चौकोनी शहर आणि दुसर्‍या बाजूला तो इवलासा ससा. जणू निसर्गाने त्याचा प्रतिनिधी पाठवला होता, हेच सांगायला की मी आहे... इथेच आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-4177572681260184559?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/4177572681260184559/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/07/blog-post_30.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/4177572681260184559'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/4177572681260184559'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/07/blog-post_30.html' title='निसर्गदूत'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1465940036634137045.post-4586712908043780850</id><published>2010-07-12T00:57:00.001-07:00</published><updated>2010-12-23T17:41:44.596-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पुस्तक'/><title type='text'>रितेपणावर जगताना...</title><content type='html'>मध्यंतरी जॉन &lt;a href="http://www.johnzerzan.net/" target="_blank" jquery1278921010107="30"&gt;झरझन&lt;/a&gt; या अमेरिकेतील एका विचारवंताचे "Running on Emptiness" नावाचे एक पुस्तक वाचायला मिळाले आणि एक कोंडी फुटल्यासारखे वाटले.  वाढते शहरीकरण, अफाट वेगाने वाढणारी लोकसंख्या, तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराचा आवळत चाललेला फास आणि एकंदरच पर्यावरण, जीवसृष्टी, समाज आणि नातेसंबंध इत्यादींचा होत चाललेला ऱ्हास याबद्दलच्या माझ्या अस्वस्थतेला आणि विचारांना एक आधार मिळाल्यासारखे झाले. मानवी नागरीकरणाबद्दल (civilization) मूलभूत असे विचार या पुस्तकात मांडले गेले आहेत. माणसाला निसर्गापासून तोडणारी आणि त्याचे शोषण करणारी ही श्रमविभाजनावर आधारित समाजव्यवस्था  हेच मानवाच्या नागरीकरणाचे आणि तथाकथित उन्नतीचे फलित आहे. दिवसेंदिवस माणसांच्या अंतरंगातला रितेपणा वाढत चालला असून निसर्गापासून दूर गेल्याने एक प्रकारच्या पोरकेपणाची आणि एकटेपणाची भावना वाढीस लागली आहे. औद्योगिक प्रगती साधलेल्या आणि सर्व भौतिक सुखे हात जोडून उभ्या असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशांमध्येच याचे प्रमाण जास्त आहे हेच पुरेसे बोलके आहे. शेती करायला लागण्यापुर्वी लाखो वर्षे मानव निसर्गाशी एकरुप होऊन राहत होता. छोट्याछोट्या टोळ्यांमध्ये राहून भटकत, शिकार करत आणि अन्न गोळा करत मनुष्यप्राणी इतर प्राण्यांसारखा निसर्गाच्या कुशीत सुखाने जगला. या लाखो वर्षांमध्ये युद्धे नव्हती, सामूहिक हिंसाचार नव्हता, साथीचे रोग नव्हते, जातिव्यवस्था नव्हती की वर्गवारीची उतरंड नव्हती. प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आणि समान.  प्रत्येक अनुभव जिवंत आणि थेट. नैसर्गिक निवडीच्या तत्त्वामुळे लोकसंख्याही आपोआप आटोक्यात असे. लाखो वर्षे ही जीवन पद्धती टिकली. पण दहा हजार वर्षांपुर्वी माणूस शेती करू लागला आणि त्यातून निर्माण झाल्या गरजा. कालमापनाची गरज, भाषेची गरज, श्रमशक्तीची गरज, तंत्रज्ञानाची गरज. एकेकाळी चक्रीय असणारा काळ हळूहळू एका रेषेत मोजला जाऊ लागला. शेतीच्या सोयीसाठी ऋतुंनुसार काळ मोजला जाऊ लागला आणि हळू हळू वर्ष, महिने, दिवस, तास, मिनिटे, सेकंद असं करत करत काळाची सूक्ष्मातिसूक्ष्म मापे अस्तित्वात आली. श्रमविभाजनातून इतराना नियंत्रित करण्यासाठी, इतरांचे श्रम मोजून त्या प्रमाणे मोबदला देण्यासाठी या कालमापनाचा फार उपयोग झाला आणि होतो. त्याचबरोबर भाषेचा विकास झाला. निसर्गात मिळणाऱ्या अनुभवाला एक शब्दरुपी ध्वनिचिन्ह बहाल करण्यात आले आणि हळूहळू या चिन्हानी मूळ अनुभवालाच विस्थापित केले. प्रत्येक गोष्ट शब्दबद्ध करण्याच्या धडपडीत तो पूर्वीचा थेट भिडणारा अनुभव नष्ट झाला आणि त्याचबरोबर नष्ट झाली ज्ञानेंद्रियांचा संवेदनशीलता. हळूहळू मग विनिमयाची गरज निर्माण झाली आणि व्यापार अस्तित्वात आला. केवळ पोट भरण्यापुरते अन्न मिळवणे संपून इतर वस्तू मिळवण्यासाठी आणखी आणखी उत्पादन करण्याची गरज निर्माण झाली. आणखी उत्पादनासाठी आणखी श्रमशक्ती, म्हणून आणखी शोषण. मानवी आणि इतर पाळीव प्राण्यांची श्रमशक्ती पुरेना म्हणून मग यंत्रं आणि ती यंत्र चालवण्यासाठी माणसांचं यांत्रिकीकरण आणि एकजिनसी आयुष्याची गरज.आता तर अशी अवस्था आहे की प्रत्येक नैसर्गिक गोष्टीला एका मानवनिर्मित चिन्हाने विस्थापित केलं आहे आणि आपण सगळे एका मानवनिर्मित चिन्हांच्या दुनियेत राहत आहोत, निसर्गापासून फटकून. सगळं काही पैशात मोजलं जातं पण आपण हे विसरून जातो की पैसा हे एक चिन्ह आहे, खऱ्या जगात त्याचं अस्तित्व नाही. तसंच तंत्रज्ञानाचंही मानवाचे कित्येक प्रश्न सोडवण्यासाठी रोज नवनवीन तंत्रज्ञान शोधले जात आहे, पण मुळात ते प्रश्न निर्माण कोणी केले हे कोणी तपासून पाहत आहे काय? आजचं तंत्रज्ञान जे प्रश्न सोडवतं त्यातले बहुसंख्य प्रश्न हे कालच्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेले आहेत. तरीही आज आपण अधिकाधिक तंत्रज्ञानावर अवलंबून राहत आहोत. यंत्रांच्या गर्दीत आपण इतके हरवून गेलोय की माणसामाणसातला संवादच आज हरवतोय. आज शास्त्रज्ञ कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करत आहेत आणि आपण ही सहज बोलताना असं म्हणतो की 'संगणक विचार करतोय' वगैरे. यात आपल्याला काहीच गैर अथवा विचित्र वाटत नाही. कित्येकाना तर माणसासारख्या दिसणाऱ्या यंत्रमानवांची गोड स्वप्ने ही पडू लागलीत. पण त्याचवेळी आपणच यंत्रांसारखेच होत चाललोय हे आपल्या लक्षात येत नाही. एका चाकोरीतले आयुष्य, रोज उठणे कामावर जाणे, पैसा कमावणे आणि थोडाफार आपापल्या मगदुराप्रमाणे नियंत्रित कलंदरपणा करणे हेच सगळ्यांचं साचेबद्ध आयुष्य झालं आहे. आज जी जीवनपद्धती आहे तिला काहीच पर्याय नाही असं आपलं एक गृहीतक आहे. पण तसं नाहीये...याला पर्याय आहे. आपण आपल्याच निर्माण केलेल्या फुग्यात राहात असताना बाहेर एक नैसर्गिक जग अजूनही आहे. आपण ठरवलं तर सगळं कृत्रिम जग नष्ट करून पुन्हा निसर्गाच्या कुशीत जाऊन एक शांत, परिपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकतो.निर्णय आपल्या हाती आहे. पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा असा टाहो फोडत वरवरची मलमपट्टी करत एक दिवस भीषण आयुष्याला सामोरं जायचं की वेळीच शहाणं होऊन मार्ग बदलायचा आणि स्वतःला वाचवायचं?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1465940036634137045-4586712908043780850?l=alavavarachepani.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://alavavarachepani.blogspot.com/feeds/4586712908043780850/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/07/blog-post.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/4586712908043780850'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1465940036634137045/posts/default/4586712908043780850'/><link rel='alternate' type='text/html' href='http://alavavarachepani.blogspot.com/2010/07/blog-post.html' title='रितेपणावर जगताना...'/><author><name>निरंजन नगरकर</name><uri>http://www.blogger.com/profile/03491431489960454464</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry></feed>
